शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

मोटारीच्या पाण्यावर चक्की सुरू

By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्या पाहण्यासाठी आलेले बहुतांश पर्यटक ऐतिहासिक पाणचक्कीही पाहण्यासाठी हमखास येतात.

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्या पाहण्यासाठी आलेले बहुतांश पर्यटक ऐतिहासिक पाणचक्कीही पाहण्यासाठी हमखास येतात. मात्र, १ फेब्रुवारीपासून पाणचक्कीत नहरचे पाणीच येणे बंद झाले आहे. त्यामुळे वक्फ बोर्ड प्रशासनाकडून पर्यटकांना मूर्ख बनविण्यासाठी हौदातील पाणी पाणचक्कीच्या भिंतीवर मोटारीने सोडण्यात येत आहे. ही शुद्ध फसवणूक पाहून पर्यटकांचा भ्रमनिरास होत आहे.पूर्वी ऐन उन्हाळ्यातही पाणचक्कीत पाणी येत असायचे. मागील दहा ते पंधरा वर्षांपासून उन्हाळ्यात पाणीच येणे बंद झाले आहे. कारण नहर-ए-पाणचक्कीच्या पाण्यावर काही समाजकंटकांनी अक्षरश: दरोडा टाकण्याचे काम सुरू केले आहे. पाण्याची ही गंभीर चोरी थांबविण्यासाठी आजपर्यंत प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही, हे विशेष. दरवर्षी उन्हाळा येतो आणि जातो. पाणचक्कीच्या पाण्याची चार दिवस बोंबाबोंब होते, नंतर सर्व काही अलबेल होते. पाण्याची ही चोरी आणखी काही वर्षे अशाच पद्धतीने सुरू राहिल्यास ऐतिहासिक ठेवा असलेल्या नहरी काही दिवसांतच इतिहासजमा होतील.पाण्यावर पिठाची गिरणी१७१४ साली पाणचक्कीची उभारणी करण्यात आली. रशियातून आलेले संत बाबा शाह मुसाफिर यांनी पाणचक्कीमध्ये धार्मिक शिक्षण देण्यासाठी निवासी आश्रमशाळा सुरू केली. त्यावेळी त्यांचे परमशिष्य व स्थापत्य अभियंता बाबा शाह महेमूद यांनी मलिक अंबरच्या ‘नहर-ए-अंबरी’तत्त्वानुसार औरंगाबादच्या उत्तरेला ८ मैलावरून नहर खोदून पाणचक्कीला पाण्याची व्यवस्था करून दिली. जटवाड्याच्या बाजूला असलेल्या ‘ओव्हर’ नदीतून या नहरचा उगम झाला आहे. या नहरीद्वारे आणलेल्या पाण्यावर पिठाची गिरणी चालवून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भोजन दिले जायचे, अशी या नहरची आख्यायिका आहे.जागोजागी नहर फोडून होत असलेल्या पाण्याच्या चोरीमुळे पाणचक्कीपर्यंत पाणी पोहोचणे दुरापास्त झाले आहे. सदासर्वदा पाण्याचा धबधबा ओकणारी पाणचक्की आज कोरडी पडली आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये टँकरच्या पाण्यावर पाणचक्कीचा खोटा इतिहास पर्यटकांसमोर ठेवण्याची वेळ आली आहे.