शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

चिमणी दिवस विशेष : भुर्र उडालेली चिऊताई परत येईना...!

By admin | Updated: March 20, 2017 16:37 IST

शहरातून ७० टक्के चिमण्या हद्दपार : सिमेंटच्या जंगलात चिमणी हरवली.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद : दिवसेंदिवस शहरांमध्ये वाढत चाललेली सिमेंटचे जंगले आणि वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे जवळपास ७० टक्के चिमण्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत. यामुळे कधी काळी अंगणात, घरात आणि अनेक वेळा जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणारी चिमणी भुर्र उडाली. त्यांना परत आणण्यासाठी आणि त्यांना वाचविण्यासाठी काही पक्षी पे्रमींकडून जीवाचा आटापिटा सुरू आहे. अद्यापतरी त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही; परंतु त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने घेतलेला आढावा...

अँबेसॅडर म्हणून ओळख असलेल्या चिमणीची शहरात लक्षणीय घट होत असल्याचे समोर आले आहे. देशात चिमणीच्या पितकंठी चिमणी, घर चिमणी, जावा चिमणी, पहाडी चिमणी, वृक्ष चिमणी अशा पाच प्रजाती आहेत. यापैकी मराठवाड्यात दोन जातींच्या चिमण्या आढळतात. यामध्ये सामााजिक चिमणी (घरची चिमणी) ही मनुष्याजवळ राहते. भिंती, कौलारूंची घरे आदी ठिकाणी ती आपले घरटे (खोपा) बांधून वास्तव्य करीत असते, तर पितकंठ चिमणी (पिवळा गळा असलेली) ही जंगलात आढळते. ही चिमणी सहसा थव्याने वावरते. नराचे डोके राखाडी आणि गळा व छाती काळी असते. डोळ्यात काजळ घातल्याचा भास होतो. चिऊताई मात्र वरून तपकिरी, डोळ्यांवर फिकट भुवया व खालून शुभ्र असते. नर व मादी सहज वेगळे ओळखायला येतात. चिमण्यांचे खाद्य हे गवताच्या बिया, धान्य, अन्न, पिकांवरच्या अळ्या, झाडांवरचे कीटक आदी आहे. ज्या शहरात चिमण्यांची संख्या अधिक आहे, तेथील पर्यावरण उत्तम असते, असे जाणकारांचे मत आहे.

माणसाचा सहवास प्रियछोटा आकार, गब्दुल बांधा, आखूड शेपूट व साधासुधा मातकट रंग, नाजूक पाय; पण भक्कम कोनाकृती चोच ही चिमणीची ओळख आहे. देशात सर्वत्रच चिमणीचे वास्तव्य आहे. शहरात, नदीकाठी, अरण्यात, माळावर, डोंगरावर, वाळवंटी प्रदेशात अशा विविध ठिकाणी चिमणीने आपले घर वसवलेले आहे; पण चिमणीला माणसाचा सहवास अधिक प्रिय असल्याचे दिसते. माणसावर प्रेम करणारे जर माणसाव्यतिरिक्त कोणी असेल; तर ती म्हणजे चिमणी आहे.

चिमणी दिसणार चित्रांमध्येच?जगभरातील लोककथा आणि ‘चिऊताई चिऊताई दार उघड’सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चिमणी गेली कुठे असा प्रश्न पडू लागला. कारखान्यातल्या चिमणीचे भकभक धूर ओकणे प्रमाणाबाहेर वाढले आणि अंगणातली चिमणी दिशेनाशी होऊ लागली. पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, २०१० सालापासून २० मार्च हा दिवस हा ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ म्हणून साजरा केला जाऊ लागला आहे.

चिमणी वाचवा अभियानऔरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात डॉ. किशोर पाठक हे चिमणी वाचविण्यासाठी जनजागृती करीत आहेत. शाळा, महाविद्यालयांसह सार्र्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात. त्यांना चिमण्यांबद्दल माहिती देऊन त्यांचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे पटवून देतात. त्यांचे फायदे-तोटे सांगतात, तसेच जखमी चिमण्यांसह इतर पक्ष्यांवर स्वखर्चातून उपचार डॉ. पाठक करतात. चिमणी उपचारातून सावरल्यावर तिला सुरक्षितस्थळी सोडले जात असल्याचेही डॉ. पाठक यांनी सांगितले.

चिमण्यांसाठी उभारले विहारजिथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आवाज, धिंगाणा, मस्ती चालतो त्याच महाविद्यालयाच्या परिसरात चिमण्यांचा चिवचिवाटही ऐकावयास मिळतो. औरंगाबाद शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील काही प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी एकत्र येत येथे पक्षी विहार तयार केले आहे. येथे पक्ष्यांसह चिमण्यांसाठी पाणी, अन्न-धान्य, निवारा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रा.रमेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली येथे पक्ष्यांची काळजी घेतली जाते. जखमी पक्षांना बरे होईपर्यंत पोटच्या लेकरासारखे सांभाळले जात असल्याचे प्रा.रमेश राऊत यांनी सांगितले. विद्यार्थीही आपला वेळ येथे देतात. शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयातही चिमण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.