शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

सोयाबीनच्या उत्पादनात आली ५० टक्के घट

By admin | Updated: October 27, 2014 00:09 IST

जालना : यंदा सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांना चांगलाच फटका बसला आहे. कापसानंतर सर्वात मोठे पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन पीकही धोक्यात आले असून,

जालना : यंदा सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांना चांगलाच फटका बसला आहे. कापसानंतर सर्वात मोठे पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन पीकही धोक्यात आले असून, उत्पादनात ५० टक्के घट येण्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. जिल्ह्यात कापसानंतर सर्वात जास्त सोयाबीनचे क्षेत्र ६४ हजार हेक्टरवर आहे. मृग नक्षत्रापासूनच पावसाने दगा दिला. परतीचा पावसानेही हुलकावणी दिली. परिणामी उत्पादनात मोठी घट येत आहे.ऐन फुलोरा तसेच दाने भरण्याच्या काळातच पाऊस उघडल्याने सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले. आज रोजी एकरी दोन क्ंिवटलच्या आसपास उतारा निघत आहे. गत वर्षी हा उतारा पाच ते सहा क्ंिवटल पर्यंत गेला होता. त्यामुळे एकरी आठ ते दहा हजार रुपयांचा खर्चही भरुन निघणे जिकिरीचे बनले आहे. ऐन पीक बहराण्याच्या काळात खंडप्राय वृष्टी झाल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. किड तसेच रोबाद्दल कृषी विभागाने मार्गदर्शन केले असले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे जोमात आलेले पीक उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून, खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन खरीप हंगामात पेरणी केली. असे असले तरी निसर्गाने पुन्हा शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट येत असल्याने शेतकरी चिंतातुर आहेत.(प्रतिनिधी)