शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

स्मार्टवर्कचा ‘विक्रम’

By admin | Updated: May 19, 2015 00:52 IST

दोन वर्षांपासूनचा दुष्काळ, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, डीएमआयसीच्या भूसंपादन प्रक्रियेतून वेळ काढीत पर्यटन, जिल्ह्यातील कर्मचारी,

दोन वर्षांपासूनचा दुष्काळ, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, डीएमआयसीच्या भूसंपादन प्रक्रियेतून वेळ काढीत पर्यटन, जिल्ह्यातील कर्मचारी, स्वस्त धान्य दुकान आणि सिमेंट बंधाऱ्यांच्या कामासाठी स्मार्ट फोनच्या मदतीने वेगवेगळे उपयुक्त अ‍ॅप्स विकसित करीत घृष्णेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासह सातारा-देवळाईतील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवून स्मार्ट वर्कचा ‘विक्रम’ मावळते जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी केला.विकास राऊत ल्ल औरंगाबाददिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) मुंबई येथील कार्यालयात सहसंचालक म्हणून विक्रमकुमार यांची नियुक्ती झाली आहे. या प्रकल्पासाठी ते पद निर्माण करण्यात आले असून, विक्रमकुमार यांची पहिली नियुक्ती त्या पदावर झाली आहे. जरी मुंबईत असलो तरी शहरात डीएमआयसीच्या निमित्ताने येणे-जाणे असेलच. शहरासाठी काम करण्याची इच्छा कायम असल्याचे मत विक्रमकुमार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. दोन वर्षे चार महिन्यांचा कार्यकाळ विक्रमकुमार यांना मिळाला. या काळात केलेल्या कामांवर त्यांनी प्रकाश टाकला. अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट स्मार्ट फोनच्या साह्याने केले. स्वस्त धान्य दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण व डॉक्टरांसाठी स्मार्टवरून अ‍ॅप्लिकेशन तयार केले. तलाठ्यांच्या हजेरीसाठी, सिमेंट बंधाऱ्यांच्या कामाच्या आढावादेखील स्मार्ट फोनवरून घेण्याची सुविधा विकसित केली. पर्यटन वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटक येतात. गाईड अ‍ॅप्स त्यासाठी तयार केले. हेडफोन लावून त्या अ‍ॅपद्वारे इंग्रजी, हिंदी, मराठी, जपानी भाषेतून लेण्यांची माहिती पर्यटकाला मिळेल. ४ ते ५ दिवसांत हे अ‍ॅप्लिकेशन सुरू होणार आहे. लेणी समोर येताच फोनवरील अ‍ॅप सुरू करताच पर्यटकांना माहिती मिळेल. म्हैसमाळ विकासासाठी कॅम्पेन रिसोर्ट टेंट तयार केले. निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव पर्यटकांना मिळण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला. मेअखेरपर्यंत या उपक्रमाचे काम पूर्ण होईल. डीपीडीसीच्या निधीतून दोन बसेस वेरूळ व अजिंठा लेणी दर्शनासाठी तयार केल्या जात आहेत. एस. टी. आणि पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पुढच्या महिन्यापासून त्या बसेस पर्यटकांच्या सेवेत येतील. महसूलजिल्ह्याच्या महसुलाचे लक्ष्य पूर्ण करता आले. ३,२९० कोटी रुपयांचा आकडा पार केला. ३२०० कोटींचा महसूल एक्साईजमधून मिळाला. सुवर्णजयंती राजस्व अभियान हाती घेतले. दाखले देण्याचे काम सुरू केले. जिल्हानिहाय कॅम्प घेतले. विविध खात्यांतर्गत उपक्रम घेतले. शिवाय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना खरीप अनुदानाचे वाटप नियोजन करून केले. डीएमआयसी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ४ हजारांपैकी ३२०० हेक्टर भूसंपादन झाले आहे. ८०० हेक्टर बाकी आहे. भूसंपादन ही क्लिष्ट प्रक्रिया असूनही शांततेत पार पडली. तहसीलदार, तलाठ्यांचे परिश्रम त्यामागे आहेत. भूसंपादनासाठी २३ लाख रुपये एकरी रक्कम मोबदल्यासाठी दिली. दुष्काळ, लोकसभा, विधानसभा निवडणुका असतानाही ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडली, याचा आनंद आहे. शिवाय सातारा-देवळाईतील अनधिकृत बांधकामेदेखील पाडली. अडीच वर्षांत मला व विभागाला कामातून उसंत मिळाली नाही. शहरात येणे होणारचडीएमआयसीच्या निमित्ताने आता शहरात येणे होणारच आहे. सहसंचालक हे पद पहिल्यांदाच निर्माण करण्यात आले असून, त्या पदाच्या कामकाजाची भूमिका अजून समजलेली नाही. माझ्याकडे नेमकी काय जबाबदारी आहे हे पदभार घेतल्यानंतरच समजेल, असेही विक्रमकुमार म्हणाले.