शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टवर्कचा ‘विक्रम’

By admin | Updated: May 19, 2015 00:52 IST

दोन वर्षांपासूनचा दुष्काळ, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, डीएमआयसीच्या भूसंपादन प्रक्रियेतून वेळ काढीत पर्यटन, जिल्ह्यातील कर्मचारी,

दोन वर्षांपासूनचा दुष्काळ, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, डीएमआयसीच्या भूसंपादन प्रक्रियेतून वेळ काढीत पर्यटन, जिल्ह्यातील कर्मचारी, स्वस्त धान्य दुकान आणि सिमेंट बंधाऱ्यांच्या कामासाठी स्मार्ट फोनच्या मदतीने वेगवेगळे उपयुक्त अ‍ॅप्स विकसित करीत घृष्णेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासह सातारा-देवळाईतील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवून स्मार्ट वर्कचा ‘विक्रम’ मावळते जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी केला.विकास राऊत ल्ल औरंगाबाददिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) मुंबई येथील कार्यालयात सहसंचालक म्हणून विक्रमकुमार यांची नियुक्ती झाली आहे. या प्रकल्पासाठी ते पद निर्माण करण्यात आले असून, विक्रमकुमार यांची पहिली नियुक्ती त्या पदावर झाली आहे. जरी मुंबईत असलो तरी शहरात डीएमआयसीच्या निमित्ताने येणे-जाणे असेलच. शहरासाठी काम करण्याची इच्छा कायम असल्याचे मत विक्रमकुमार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. दोन वर्षे चार महिन्यांचा कार्यकाळ विक्रमकुमार यांना मिळाला. या काळात केलेल्या कामांवर त्यांनी प्रकाश टाकला. अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट स्मार्ट फोनच्या साह्याने केले. स्वस्त धान्य दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण व डॉक्टरांसाठी स्मार्टवरून अ‍ॅप्लिकेशन तयार केले. तलाठ्यांच्या हजेरीसाठी, सिमेंट बंधाऱ्यांच्या कामाच्या आढावादेखील स्मार्ट फोनवरून घेण्याची सुविधा विकसित केली. पर्यटन वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटक येतात. गाईड अ‍ॅप्स त्यासाठी तयार केले. हेडफोन लावून त्या अ‍ॅपद्वारे इंग्रजी, हिंदी, मराठी, जपानी भाषेतून लेण्यांची माहिती पर्यटकाला मिळेल. ४ ते ५ दिवसांत हे अ‍ॅप्लिकेशन सुरू होणार आहे. लेणी समोर येताच फोनवरील अ‍ॅप सुरू करताच पर्यटकांना माहिती मिळेल. म्हैसमाळ विकासासाठी कॅम्पेन रिसोर्ट टेंट तयार केले. निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव पर्यटकांना मिळण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला. मेअखेरपर्यंत या उपक्रमाचे काम पूर्ण होईल. डीपीडीसीच्या निधीतून दोन बसेस वेरूळ व अजिंठा लेणी दर्शनासाठी तयार केल्या जात आहेत. एस. टी. आणि पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पुढच्या महिन्यापासून त्या बसेस पर्यटकांच्या सेवेत येतील. महसूलजिल्ह्याच्या महसुलाचे लक्ष्य पूर्ण करता आले. ३,२९० कोटी रुपयांचा आकडा पार केला. ३२०० कोटींचा महसूल एक्साईजमधून मिळाला. सुवर्णजयंती राजस्व अभियान हाती घेतले. दाखले देण्याचे काम सुरू केले. जिल्हानिहाय कॅम्प घेतले. विविध खात्यांतर्गत उपक्रम घेतले. शिवाय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना खरीप अनुदानाचे वाटप नियोजन करून केले. डीएमआयसी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ४ हजारांपैकी ३२०० हेक्टर भूसंपादन झाले आहे. ८०० हेक्टर बाकी आहे. भूसंपादन ही क्लिष्ट प्रक्रिया असूनही शांततेत पार पडली. तहसीलदार, तलाठ्यांचे परिश्रम त्यामागे आहेत. भूसंपादनासाठी २३ लाख रुपये एकरी रक्कम मोबदल्यासाठी दिली. दुष्काळ, लोकसभा, विधानसभा निवडणुका असतानाही ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडली, याचा आनंद आहे. शिवाय सातारा-देवळाईतील अनधिकृत बांधकामेदेखील पाडली. अडीच वर्षांत मला व विभागाला कामातून उसंत मिळाली नाही. शहरात येणे होणारचडीएमआयसीच्या निमित्ताने आता शहरात येणे होणारच आहे. सहसंचालक हे पद पहिल्यांदाच निर्माण करण्यात आले असून, त्या पदाच्या कामकाजाची भूमिका अजून समजलेली नाही. माझ्याकडे नेमकी काय जबाबदारी आहे हे पदभार घेतल्यानंतरच समजेल, असेही विक्रमकुमार म्हणाले.