शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

रस्ता दाखवतोय शहराचा दळभद्रीपणा

By admin | Updated: October 29, 2014 00:43 IST

संतोष धारासूरकर ,जालना जागोजागी खचलेला अन् उखडलेला रस्ता... त्यावर फुटाफुटाला खड्डेच खड्डे... ते सुद्धा गुडघ्या-कमरेएवढ्या आकाराचे... प्रत्येक खड्डा अ‍ॅटेंड करणे अनिवार्य.

संतोष धारासूरकर ,जालनाजागोजागी खचलेला अन् उखडलेला रस्ता... त्यावर फुटाफुटाला खड्डेच खड्डे... ते सुद्धा गुडघ्या-कमरेएवढ्या आकाराचे... प्रत्येक खड्डा अ‍ॅटेंड करणे अनिवार्य... त्याशिवाय पुढे सरकणेच अशक्य... खड्डा चुकवाल तर अपघात अटळच... त्यामुळेच आदळाआपट करा अन पल्ला गाठा... जगावेगळ्या भोकरदन रस्त्याचा हा मूलमंत्रच !रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता या व्यावहारिक सर्वश्रूत वाक्यप्रचाराची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे जालना ते तीर्थक्षेत्र राजूर मार्गे भोकरदन रस्ता. जालन्यातील भोकरदन नाक्यावरून वळाल्याबरोबर बालाजी चौकात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे तर काही अंतरावर उद्योगपती बद्रीनारायण बारवाले यांचे निवासस्थान. तेथून पुढे औरंगाबाद ते देऊळगावराजा बायपास. तो चौक ओलांडल्यानंतर जगावेगळा तो राजूर रस्ता. जालन्यापासून तीर्थक्षेत्र राजूर हे २५ कि़मी.वर. तेथून पुढे भोकरदन २६ कि़मी., जालना ते भोकरदन या दोन शहरांचा मध्यबिंदू म्हणजे राजूर. एकूण ५० ते ५२ कि़मी.चा हा रस्ता. पश्चिम महाराष्ट्र ते खान्देश किंवा मध्यप्रदेश, गुजरातला जोडणारा. १८१ क्रमांकाचा हा राज्यमार्ग. साहजिकच अत्यंत वर्दळीचा हा रस्ता. पहाटेपासून मध्यरात्री उशिरापर्यंत, चोवीस तास म्हणा या रस्त्यावरून हलक्या व जड वाहनांची प्रचंड अशी वाहतूक़ परिणामी या रस्त्यास अनन्यसाधारण असे महत्व. परंतु या रस्त्याचे दुर्देव असे, तो आहे दुहेरी आणि अरूंद. दोन राज्यांना जोडणाऱ्या या राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव होता. दहा वर्षांपासून त्याचा बोलबालाच. प्रत्यक्षात प्रस्ताव मार्गी लागावा म्हणून अधिकारी असो की, लोकप्रतिनिधी यांनी आजवर काडीचेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे चौपदरीकरण म्हणजे काय, हे या भागास उमजलेच नाही !चौपदरीकरण तर राहिले दूरच, दुर्देव असे की, वर्षानुवर्षांपासून हा राज्यमार्ग दळभद्री अवस्थेत आहे. भयावह अवस्थेतील हा रस्ता, या भागातल्या मागासलेपणासह दळभद्री मानसिकताही दाखवित आहे. कारण ५० - ५२ कि़मी.च्या रस्त्यावर ५० फूटसुद्धा खड्यांविना रस्ता अस्तित्वात नाही. केंद्रीयमंत्री दानवे यांच्या निवासस्थानापासून खड्डेमय रस्त्यास सुरूवात होते, ते भोकरदनपर्यंत. जागोजागी खचलेला, पूर्णत: उखडलेल्या या रस्त्यावर फुटाफुटावर खड्डेच खड्डे आहेत. काही छोटे तर काही मोठे. काही गुडघ्याएवढे तर काही कमरेएवढ्या आकाराचे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना प्रत्येक खड्डा अ‍ॅटेंड केल्याशिवाय पर्यायच नाही. कारण चुकवावा तरी कोणता खड्डा. त्यामुळे प्रत्येक खड्डयात आदळाआपट केल्याशिवाय पुढे सरकणेच अशक्य ठरते आहे. बायपासवरील चौफुलीपासून मानदेऊळगाव, बावणेपिंपळगाव, पांगरी, तुपेवाडी, वसंतनगर ते राजूरपर्यंतच्या रस्त्यावर हजारो खड्डे आहेत. रस्त्यात खड्डा की, खड्डयात रस्ता या वाक्यप्रचाराचा अनुभव जणू हा रस्ता दाखवतो आहे. कारण राजूरपर्यंत २५ कि़मी. अंतरावरच्या रस्त्यावर २५ फूटसुद्धा चांगल्या अवस्थेतील रस्ता अस्तित्वात नाही. पुढे तर आनंदीआनंदच. केंद्रीयमंत्री दानवे यांच्या बालेकिल्ल्यापर्यंत म्हणजे भोकरदनपर्यंत रस्त्याची अक्षरश: चाळणीच झाली आहे. तोही सरासरी २६ कि़मी. चा रस्ता पूर्णत: उखडलेला आहे. जालन्यापासून राजूरमार्गे भोकरदनपर्यंत ५० कि़मी. अंतर गाठावयास खरेतर वाहनाद्वारे एक तासाचा अवधी लागावा. परंतु जगावेगळ्या दिव्य अशा रस्त्यावरून भोकरदन गाठण्यासाठी दोन ते सव्वादोन तास वाहनधारकांना अवधी लागतो आहे. कारण या रस्त्यावरून वाहने २० ते ३० च्या ताशी वेगानेच चालवावी लागतात. त्यात प्रत्येक खड्डा अ‍ॅटेंड करावाच लागतो. खड्डयाचे दर्शन घेतल्याशिवाय वाहन पुढे सरकूच शकत नाही. खड्डयास वळसा घातला तर अपघात हा अटळच. त्यामुळे या राज्य मार्गावरून दररोज हजारो वाहने, वाहनधारक मोठा मनस्ताप, इंधनाचा खर्च, वेळेचा अपव्यय सहन करीत ये-जा करीत आहेत. (क्रमश....)