शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

दुकान फोडून ६ लाखांचे दागिने लंपास

By admin | Updated: August 7, 2014 01:15 IST

शेलगाव : बदनापूर तालुक्यातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील लोळगे ज्वेलर्स ही दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले.

शेलगाव : बदनापूर तालुक्यातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील लोळगे ज्वेलर्स ही दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.जालना येथील रहिवासी सराफा व्यापारी राजेश बाबूराव लोळगे यांची शेलगावात लोळगे ज्वेलर्स ही सोन्याचांदीचे दुकान आहे. मंगळवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास लोळगे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, मध्यरात्री अज्ञान चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सोन्याचांदीचे दागिने असा वरील किंमतीचा ऐवज चोरून नेला.लोळगे हे आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले. दुकान उघडल्यानंतर साहित्य अस्ताव्यस्त झालेले पाहून दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती बदनापूर पोलिसांना दिली. त्यावर पोलिस निरीक्षक पंकज जाधव, फौजदार राजपूत, कॉ. शिवनकर आदींनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच जालना येथून श्वानपथकासही पाचरण करण्यात आले. श्वानाने जालना मार्गावर गावाच्या मुख्यरस्त्याच्या कमानीपर्यंत माग काठून तेथेच घुटमळले. चारीच्या या घटनेमुळे शेलगाव ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.(वार्ताहर)जिल्ह्यात बुधवारी रात्री शेलगावच्या सराफा दुकानासह चार ठिकाणी चोऱ्या झाल्या. जालना शहरातील गांधीनगरातील संतोष घुले यांच्या घरी झालेल्या चोरीत ११ हजाराचे संसार उपयोगी साहित्य चोरून नेले. कुंभारपिंपळगाव ता घनसावंगी येथील बीएसएलच्या टावरवरील ५४ हजार रूपये किमतीच्या ६ बॅटऱ्या चोरून नेल्या, तर धावडा ता. भोकरदन येथील राजू देशमुख यांच्या टेम्पोचे २२ हजार रूपये किमतीचे टायर चोरट्यांनी चोरून नेले.४मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. काही दिवसापूर्वीच जालना- औरंगाबाद ग्रामीण बँक फोडण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. बँकेच्या तीन कुलूपे तोडल्यानंतर सायरनचा आवाज झाल्याने चोरट्यांनी पळ काढला होता. तसेच गावातील बैल, विहिरीवरील मोटारींच्या चोरीच्या घटनाही झालेल्या आहेत. गावात पोलिस चौकी स्थापन करून कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.