शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

शिवसेनेच्या योजना चिरंतन विकासाच्या

By admin | Updated: October 8, 2014 01:09 IST

औरंगाबाद : राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यावर चिरंतन विकास करणाऱ्या योजना तयार ठेवल्या आहेत, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

औरंगाबाद : राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यावर चिरंतन विकास करणाऱ्या योजना तयार ठेवल्या आहेत, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी सभेत बोलताना केले. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आठवी ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम असलेले टॅब्लेट देण्यात येईल. त्यामध्ये उर्दूसह सर्व भाषांनिहाय अभ्यासक्रम असेल. क्रांतिकारी घटनांचा इतिहासही त्यात असेल. ग्रामीण भागातील मुलांना नामांकित संस्थांची ड्रिगी आहे त्या भागात शिकून मिळविता येईल. इंद्रधनुष्य, शिवआरोग्य योजना तयार केल्या आहेत. शिवआरोग्य योजनेत रुग्णांना एकात्मिक उपचाराची सोय करून देण्यात येईल. पापड आणि लोणचे तयार करणे म्हणजे महिला बचत गट नव्हे. लोकल टू ग्लोबल उत्पादनांशी बचत गट बरोबरी करतील. त्यासाठी त्यांना शिवशाहीचे शासन अर्थसाहाय्य देईल. शेतीसाठी स्वतंत्र बजेट असेल. शेतकऱ्यांना विहिरीतील पाणी उपसण्यासाठी स्वयंचलित ऊर्जेचे साधन देण्यात येईल. संत विद्यापीठ स्थापन करण्याची संकल्पना ठाकरे यांनी बोलून दाखविली. भाजपाचा जावईशोध गुजरात, छत्तीसगढ या राज्यांत भाजपाची सत्ता होती. तेव्हा देशात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. असे असताना त्या दोन्ही राज्यांचा विकास झाला नाही का? मग दिल्लीत भाजपाचे सरकार असल्यामुळे राज्यात भाजपाचे सरकार आले तरच विकास होईल. हा भाजपाचा जावईशोध नाही का, असा टोला ठाकरे यांनी लगावला. शिवसेनेचे सरकार आल्यावर शहरातील विविध विकास योजना अडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सेना पक्षप्रमुख ठाकरे यांची मागील पाच वर्षांत झालेल्या सभेच्या तुलनेत आजच्या सभेला मोठी गर्दी होती. लोकसभा निवडणुकीलादेखील खा. खैरे यांना सभेसाठी गर्दी जमविता आली नव्हती. आ. प्रदीप जैस्वाल व त्यांच्या टीमने आजच्या सभेचे नियोजन केले होते. व्यासपीठावरील शिवसेनाप्रमुख आणि पक्षनिशाणीचे होर्डिंग लक्षवेधी होते.