शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

शहरातील विद्युत खांबांवर शिवसेना लावणार कंदिल

By admin | Updated: June 9, 2014 00:11 IST

जालना: गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असून शिवसेनेच्या वतीने विद्युत खांबांवर कंदिल लावण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी म्हटले आहे.

जालना: शहरातील पथदिवे गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असून शिवसेनेच्या वतीने विद्युत खांबांवर कंदिल लावण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी म्हटले आहे.अंबेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शहरात चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण पथदिवे बंद असल्यामुळेच वाढले आहे. महिला व तरूण मुलींना रात्री घराबाहेर पडण्यास भीती वाटते. बस-रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री-अपरात्री शहरात आल्यानंतर अंधाराचा गैरफायदा घेऊन लुटण्याचे प्रकार घडत आहेत. शहर अंधारात असताना पालिकेला मिळालेल्या आयएसओ प्रमाणपत्राबद्दलही अंबेकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या दीड वर्षात सर्वधर्मियांनी आपापले सण, उत्सव समारंभ अंधारातच साजरे केले आहेत. शिवसेनेने यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन शहरातील अंधाराच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. चौकाचौकात हायमास्ट दिवे लावून पैशाचा अपव्यय केला जात असल्याचा आरोपही अंबेकर यांनी केला आहे. हे हायमास्ट दिवे उभारण्याऐवजी वीज वितरण कंपनीचे वीज बिल भरून सर्व पथदिवे सुरू करावेत. या मागणीकडे लक्ष देऊन चार दिवसांत पथदिवे सुरू न केल्यास शिवसेनेच्या वतीने विद्युत खांबांवर कंदील लावून आंदोलन केले जाणार असल्याचेही नमूद केले.