शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
5
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
6
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
7
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
8
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
9
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
10
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
11
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
12
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
13
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
14
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
15
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
16
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
19
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
20
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?

शिरूर तालुक्यात रानडुकरांचा धुमाकूळ

By admin | Updated: September 11, 2014 00:23 IST

शिरूरकासार: गेल्या दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. पिके वाढीला लागली असतानाच हरिण, मोर, रानडुक्कर यांच्याकडून पिकांची नासधूस होत आहे.

शिरूरकासार: गेल्या दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. पिके वाढीला लागली असतानाच हरिण, मोर, रानडुक्कर यांच्याकडून पिकांची नासधूस होत आहे. वन विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने तोंडचा घास पळवून नेल्या सारखी स्थिती शेतकऱ्यांवर ओढावली आहे. गणपतीच्या आगमनापासून तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसामुळे नद्या व ओढ्यांना पाणी आले होते. जागोजागी पाणीच पाणी साठल्याचे चित्र आजही तालुक्यात पहावयास मिळत आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून रानडुकरांचा धुमाकूळ वाढला आहे. रानडुकरे कळपाने येऊन पिके उद्ध्वस्त करीत चालली आहेत. त्यांना प्रतिरोध केला असता ते हल्ला करत असल्याचे यापूर्वी अनेक वेळा समोर आल्याने शेतकरी भितीपोटी त्यांना प्रतिरोध करीत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत रानडुकरे धुमाकूळ घालून पिके उद्ध्वस्त करत चालले आहेत. रात्रीच्या किंवा सायंकाळच्यावेळी रानडुकरे कळपाने शेत परिसरात दाखल होतात. पायाने जमीन उकरून धुमाकूळ घालतात. यामुळे पिके उन्मळून खाली पडत आहेत. एकामागून एक डुकरे पळत असल्यामुळे पिके त्यांच्या पायदळी तुडविली जातात. रानडुकरे हल्ला करत असल्याच्या कारणावरून शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या शकली लढवित आहेत. काही ठिकाणी ताराचे कुंपण केले आहे तर काही ठिकाणी दोऱ्या बांधलेल्या आहेत. मात्र याच्या मधूनही डुक्कर शेत परिसरात प्रवेश करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. या समस्येशी दोन हात कसे करावेत? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. पिके बहरात आली असताना त्याची नासधूस वन्य प्राण्यांमार्फत होत आहे. याची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांना विमाही मिळत नाही. याची दखल घेत शासनाने वन्य जीवांकडून पिकांची हानी झाली तर विमा द्यावा, अशी मागणी गोकुळ सानप यांनी पत्रकान्वये केली आहे. शिरूर तालुक्यातील रायमोहा, आव्हळवाडी, हटकरवाडी, भानकवाडी, धनगरवाडी, टाकळवाडी, येवलवाडी, वंजारवाडी, डिसलेवाडी, डोळेवाडी, दत्तनगर येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात वन्य जीवांकडून नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणचे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचा पंचनामा जिल्हा परिषदेने करावा व त्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी गोकुळ सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी केली आहे. तसेच रानडुकरांचा बंदोबस्त करावा, त्याबाबत वन विभागाला सूचना द्यावेत, असेही सानप यांनी पत्रकात म्हटले आहे.(वार्ताहर)