शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

शिरूर तालुक्यात रानडुकरांचा धुमाकूळ

By admin | Updated: September 11, 2014 00:23 IST

शिरूरकासार: गेल्या दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. पिके वाढीला लागली असतानाच हरिण, मोर, रानडुक्कर यांच्याकडून पिकांची नासधूस होत आहे.

शिरूरकासार: गेल्या दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. पिके वाढीला लागली असतानाच हरिण, मोर, रानडुक्कर यांच्याकडून पिकांची नासधूस होत आहे. वन विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने तोंडचा घास पळवून नेल्या सारखी स्थिती शेतकऱ्यांवर ओढावली आहे. गणपतीच्या आगमनापासून तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसामुळे नद्या व ओढ्यांना पाणी आले होते. जागोजागी पाणीच पाणी साठल्याचे चित्र आजही तालुक्यात पहावयास मिळत आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून रानडुकरांचा धुमाकूळ वाढला आहे. रानडुकरे कळपाने येऊन पिके उद्ध्वस्त करीत चालली आहेत. त्यांना प्रतिरोध केला असता ते हल्ला करत असल्याचे यापूर्वी अनेक वेळा समोर आल्याने शेतकरी भितीपोटी त्यांना प्रतिरोध करीत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत रानडुकरे धुमाकूळ घालून पिके उद्ध्वस्त करत चालले आहेत. रात्रीच्या किंवा सायंकाळच्यावेळी रानडुकरे कळपाने शेत परिसरात दाखल होतात. पायाने जमीन उकरून धुमाकूळ घालतात. यामुळे पिके उन्मळून खाली पडत आहेत. एकामागून एक डुकरे पळत असल्यामुळे पिके त्यांच्या पायदळी तुडविली जातात. रानडुकरे हल्ला करत असल्याच्या कारणावरून शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या शकली लढवित आहेत. काही ठिकाणी ताराचे कुंपण केले आहे तर काही ठिकाणी दोऱ्या बांधलेल्या आहेत. मात्र याच्या मधूनही डुक्कर शेत परिसरात प्रवेश करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. या समस्येशी दोन हात कसे करावेत? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. पिके बहरात आली असताना त्याची नासधूस वन्य प्राण्यांमार्फत होत आहे. याची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांना विमाही मिळत नाही. याची दखल घेत शासनाने वन्य जीवांकडून पिकांची हानी झाली तर विमा द्यावा, अशी मागणी गोकुळ सानप यांनी पत्रकान्वये केली आहे. शिरूर तालुक्यातील रायमोहा, आव्हळवाडी, हटकरवाडी, भानकवाडी, धनगरवाडी, टाकळवाडी, येवलवाडी, वंजारवाडी, डिसलेवाडी, डोळेवाडी, दत्तनगर येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात वन्य जीवांकडून नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणचे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचा पंचनामा जिल्हा परिषदेने करावा व त्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी गोकुळ सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी केली आहे. तसेच रानडुकरांचा बंदोबस्त करावा, त्याबाबत वन विभागाला सूचना द्यावेत, असेही सानप यांनी पत्रकात म्हटले आहे.(वार्ताहर)