शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: October 29, 2014 00:45 IST

लातूर : यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीटंचाईचे सावट जिल्ह्यावर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संभाव्य उपाययोजनांसाठी १ कोटी ८३ लाख ८९ हजारांचा कृती आराखडा तयार केला

लातूर : यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीटंचाईचे सावट जिल्ह्यावर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संभाव्य उपाययोजनांसाठी १ कोटी ८३ लाख ८९ हजारांचा कृती आराखडा तयार केला असून, ४४८ उपाययोजनांवर हा खर्च अपेक्षित आहे. सध्या लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात मासुर्डी येथे तीव्र पाणीटंचाई असून, या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, मांजरा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा असून, २३ एमएम क्यूब इतकेच वापरायोग्य पाणी आहे.जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पावसाळा संपण्यापूर्वीच कृती आराखड्यावर काम सुरू केले आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचा १ कोटी ८३ लाख ८९ हजारांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे. शिवाय, पाझर तलाव, साठवण तलाव, मध्यम प्रकल्प व बॅरेजेस ज्योत्याखाली आहेत. त्यामुळे भीषण पाणीटंचाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार करून संभाव्य उपाययोजना आखल्या आहेत. आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात ३१ टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार आहे. त्यासाठी ३७.३५ लाख खर्च अपेक्षित असून, कृती आराखड्यात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. ३३१ विंधन विहिरी अधिग्रहण होण्याची शक्यता असून, यावर १ कोटी २ लाख २६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. नवीन ३२ विंधन विहिरी घेण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले असून, त्यासाठी १७.१० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नळ योजना दुरुस्तीच्या संभाव्य तीन योजना आहेत. त्यासाठी ८ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, विंधन विहिरीच्या विशेष दुरुस्तीसाठी ४३ योजना आहेत. त्यासाठी ९.६८ लाख रुपये खर्च होणार आहेत. संभाव्य उपाययोजनेत तात्पुरती पूरक नळयोजना एक असून, त्यासाठी ३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. विंधन विहिरी व विहिरीच्या खोलीकरणाच्या सात योजना असून, त्यावर ४.५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अशा एकूण ४४८ उपाययोजनाआॅक्टोबर ते डिसेंबर अखेरपर्यंत हाती घेण्याचे संभाव्य नियोजन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. यासाठी १ कोटी ८३ लाख ८९ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)