शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: October 29, 2014 00:45 IST

लातूर : यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीटंचाईचे सावट जिल्ह्यावर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संभाव्य उपाययोजनांसाठी १ कोटी ८३ लाख ८९ हजारांचा कृती आराखडा तयार केला

लातूर : यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीटंचाईचे सावट जिल्ह्यावर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संभाव्य उपाययोजनांसाठी १ कोटी ८३ लाख ८९ हजारांचा कृती आराखडा तयार केला असून, ४४८ उपाययोजनांवर हा खर्च अपेक्षित आहे. सध्या लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात मासुर्डी येथे तीव्र पाणीटंचाई असून, या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, मांजरा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा असून, २३ एमएम क्यूब इतकेच वापरायोग्य पाणी आहे.जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पावसाळा संपण्यापूर्वीच कृती आराखड्यावर काम सुरू केले आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचा १ कोटी ८३ लाख ८९ हजारांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे. शिवाय, पाझर तलाव, साठवण तलाव, मध्यम प्रकल्प व बॅरेजेस ज्योत्याखाली आहेत. त्यामुळे भीषण पाणीटंचाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार करून संभाव्य उपाययोजना आखल्या आहेत. आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात ३१ टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार आहे. त्यासाठी ३७.३५ लाख खर्च अपेक्षित असून, कृती आराखड्यात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. ३३१ विंधन विहिरी अधिग्रहण होण्याची शक्यता असून, यावर १ कोटी २ लाख २६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. नवीन ३२ विंधन विहिरी घेण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले असून, त्यासाठी १७.१० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नळ योजना दुरुस्तीच्या संभाव्य तीन योजना आहेत. त्यासाठी ८ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, विंधन विहिरीच्या विशेष दुरुस्तीसाठी ४३ योजना आहेत. त्यासाठी ९.६८ लाख रुपये खर्च होणार आहेत. संभाव्य उपाययोजनेत तात्पुरती पूरक नळयोजना एक असून, त्यासाठी ३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. विंधन विहिरी व विहिरीच्या खोलीकरणाच्या सात योजना असून, त्यावर ४.५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अशा एकूण ४४८ उपाययोजनाआॅक्टोबर ते डिसेंबर अखेरपर्यंत हाती घेण्याचे संभाव्य नियोजन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. यासाठी १ कोटी ८३ लाख ८९ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)