शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

‘सेट’चा निकाल ६.७३ टक्के; कटऑफ पॉईंटमध्ये पहिल्यांदाच झाली घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 18:29 IST

२७ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय पात्रता चाचणीचा (सेट) निकाल बुधवारी रात्री उशिरा घोषित झाला.

ठळक मुद्दे वर्षात दोनवेळा परीक्षा घेण्याचा नियम पायदळीसर्वच विषयांत कट ऑफ पाॅईंटमध्ये ३ ते ५ टक्क्यांनी घसरण

औरंगाबाद : डिसेंबरमध्ये झालेल्या सहायक प्राध्यापक राज्य पात्रता चाचणीमध्ये (सेट) यंदा पात्रता होण्यासाठीच्या टक्केवारीमध्ये (कटऑफ) पाॅईंट ३ ते ५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. मागील आठ-नऊ वर्षांनंतर प्राध्यापकांची मोठी भरती झाली नाही. प्राध्यापक भरती प्रक्रिया रखडल्यामुळे ‘सेट-नेट’ देण्याबाबत निरुत्साह असल्याचे यामागचे कारण असावे, असे पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये बोलले जात आहे.

२७ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय पात्रता चाचणीचा (सेट) निकाल बुधवारी रात्री उशिरा घोषित झाला. यामध्ये विविध ३२ विषयांसाठी परीक्षा दिलेल्या पात्र विद्यार्थ्यांची यादी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वच विषयांत कट ऑफ पाॅईंटमध्ये ३ ते ५ टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी दोन्ही राज्यांतील ६१ हजार ११४ विद्यार्थी बसले होते. यापैकी ४ हजार ११४ विद्यार्थी पात्र ठरले असून ६.७३ टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेसाठी फेब्रुवारी २०२० मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. ही परीक्षा जून २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ही परीक्षा ६ महिने लांबणीवर पडली व ती २७ डिसेंबर रोजी घेण्यात आली. या परीक्षेत पात्रता होण्यासाठी विषयनिहाय टक्केवारी अशी : मराठी (४८.६७), हिंदी (५३.३३), इतिहास (४९.३३), संगणकशास्त्र (४९.३३), तत्त्वज्ञान (५३.३३), मानसशास्त्र (५४), समाजशास्त्र (५२), वृत्तपत्र विद्या अभ्यास व लोकसंवाद (५४.६७), शिक्षणशास्त्र (५३.३३) या विषयांचा कटऑफ पाॅईंट पहिल्यांदाच खाली आहे.

राज्य आयोगाप्रमाणेच सेटमध्येही अनियमितताराज्य लोकसेवा आयोगाप्रमाणे ‘सेट’मध्येही परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत अनियमितता होत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) ही नियमितपणे घेतली जात असताना, राज्य पात्रता चाचणी (सेट) घेतली जात नाही. गेली तीन वर्षे प्रत्येक वर्षात ही परीक्षा एकदाच झाली आहे. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जावी, असे ‘युजीसी’चे निर्देश आहेत. मात्र, महाराष्ट्रात २८ जानेवारी २०१८, २३ जून २०१९ आणि २७ डिसेंबर २०२० रोजी ही परीक्षा झाली. या वर्षातही एकच परीक्षा होण्याची शक्यता आहे. नेट ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्थापन केल्यापासून ही परीक्षा व्यवस्थित पार पडत आहे. नेटप्रमाणे सेटची ऑनलाईन परीक्षा होत नाही. कोविडच्या काळात तरी ऑनलाईन परीक्षा घ्यावी, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षा