शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

महा ई-सेवा केंद्रातून घेतला जातोय दुप्पटीने सेवा कर

By admin | Updated: August 6, 2015 00:06 IST

लातूर : जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत नागरी सेवेच्या अकरा प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी जिल्ह्यात ३४० पैकी १६३ महा-ई सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

लातूर : जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत नागरी सेवेच्या अकरा प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी जिल्ह्यात ३४० पैकी १६३ महा-ई सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रातून सेवेच्या नावाखाली दुपटीने सेवा कर लादला जात आहे. एक प्रकारे नागरिकांची लूटच यातून केली जात आहे. जिल्ह्यातील दहाही तालुक्यांत महा-ई सेवा केंद्र आहेत. या केंद्रातून सातबारा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलीअर, अल्पभूधाकरक, ८ अ चा उतारा, भूमिहीन प्रमाणपत्र, आधार कार्ड यासह आदी ११ प्रकारच्या सेवा नागरिकांना दिल्या जातात. गावातल्या गावात प्रमाणपत्र मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत ३४० महा ई-सेवा केंद्राची नोंदणी करण्यात आली़ त्यापैकी २९६ केंद्रांना मान्यता मिळाली आहे. यातील १६३ महा ई-सेवा केंद्र सुरु आहेत़ परंतु, सेवा कर नागरिकांवर दुपटीने लादला जात आहे. सातबारासाठी २२ रुपये सेवा कर असताना ३० रुपये घेतले जात आहेत. आधार कार्डसााठी सेवा कर नसताना ५० रुपये घेतले जातात. रहिवासी प्रमाणपत्रासाठी ५० रुपये, सातबाऱ्यासाठी ४७ रुपये, ८ अ साठी ४० रुपये अल्पभूधारक प्रमाणापत्रासाठी व भूमिहिन प्रमाणपत्रासाठी ९४ रुपये, खाण परवान्यासाठी ५० रुपये असे जास्तीचे सेवा कर लाभार्थ्यांच्या माथी मारले जात आहेत. त्याची पावतीही दिली जात नाही. शिवाय, काही बोगस केंद्र असल्याचे निदर्शनास आले आहे.आधारकार्ड काढण्याची सर्व प्रक्रिया मोफत आहे़ परंतु, एखाद्या आधार कार्डावरील नावात चूक असेल, तर त्याच्यासाठी १५ रुपये व फोटोमध्ये चूक असेल तर २० रुपये सेवा कर घेतला जातो़ या व्यतिरिक्त कुठलाही सेवा कर नसताना काही केंद्रांकडून १०० रुपये घेतले जात आहेत.याबाबत महा ई-सेवा केंद्राचे जिल्हा समन्वयक शैलेश कुमदाळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून असे प्रकार होत नाहीत़ जर याबाबत कुठली तक्रार आली तर त्या केंद्रावर तात्काळ कारवाई केली जाईल. लातूर तालुक्यातील निवळी येथील महा ई-सेवा केंद्राची तक्रार होती. त्याची चौकशी करून केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे.