शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

रबीसाठीचे दुसरे आवर्तन अडचणीत

By admin | Updated: December 1, 2014 01:27 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून रबी पिकांसाठी दोन आवर्तने देण्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले होते; परंतु गोदावरीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडावे लागल्यामुळे आणि परळी थर्मलसाठी पाणी द्यावे लागणार

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून रबी पिकांसाठी दोन आवर्तने देण्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले होते; परंतु गोदावरीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडावे लागल्यामुळे आणि परळी थर्मलसाठी पाणी द्यावे लागणार असल्यामुळे आता शेतीसाठी दुसरे आवर्तन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. जुलैपर्यंतची गरज भागवून धरणाच्या उपयुक्त साठ्यात केवळ ७० दलघमी पाणीच शिल्लक राहणार आहे, तर दुसऱ्या आवर्तनासाठी किमान ११० दलघमी पाणी लागणार आहे. त्यामुळे वरच्या भागातील धरणांमधून पाणी आले तरच शेतीला दुसरे आवर्तन मिळू शकेल, असे कडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जायकवाडी धरणामुळे औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. यंदा जायकवाडी धरणात पावसाळ्याच्या शेवटी ४४ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे जलसंपदा विभागाने जायकवाडीतून रबी हंगामासाठी दोन पाणी पाळ्या (आवर्तन) देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात पहिले आवर्तन देण्यात आले. दरम्यान, आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यांत नागरिकांच्या मागणीनुसार १५ दलघमी पाणी सोडावे लागले. याशिवाय आगामी काळात परळी थर्मललाही पाणी देण्याची गरज भासणार आहे. जायकवाडीत आजघडीला २८.४१ टक्के म्हणजे ६१६ दलघमी पाणी आहे. जुलै २०१५ पर्यंतची पिण्याच्या पाण्याची गरज, औद्योगिक पाणी वापर आणि होणारे बाष्पीभवन यासाठी ४८० दलघमी पाणी लागणार आहे. यंदा माजलगाव धरणात पाणी राहिलेले नाही.