शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

रबीसाठीचे दुसरे आवर्तन अडचणीत

By admin | Updated: December 1, 2014 01:27 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून रबी पिकांसाठी दोन आवर्तने देण्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले होते; परंतु गोदावरीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडावे लागल्यामुळे आणि परळी थर्मलसाठी पाणी द्यावे लागणार

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून रबी पिकांसाठी दोन आवर्तने देण्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले होते; परंतु गोदावरीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडावे लागल्यामुळे आणि परळी थर्मलसाठी पाणी द्यावे लागणार असल्यामुळे आता शेतीसाठी दुसरे आवर्तन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. जुलैपर्यंतची गरज भागवून धरणाच्या उपयुक्त साठ्यात केवळ ७० दलघमी पाणीच शिल्लक राहणार आहे, तर दुसऱ्या आवर्तनासाठी किमान ११० दलघमी पाणी लागणार आहे. त्यामुळे वरच्या भागातील धरणांमधून पाणी आले तरच शेतीला दुसरे आवर्तन मिळू शकेल, असे कडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जायकवाडी धरणामुळे औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. यंदा जायकवाडी धरणात पावसाळ्याच्या शेवटी ४४ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे जलसंपदा विभागाने जायकवाडीतून रबी हंगामासाठी दोन पाणी पाळ्या (आवर्तन) देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात पहिले आवर्तन देण्यात आले. दरम्यान, आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यांत नागरिकांच्या मागणीनुसार १५ दलघमी पाणी सोडावे लागले. याशिवाय आगामी काळात परळी थर्मललाही पाणी देण्याची गरज भासणार आहे. जायकवाडीत आजघडीला २८.४१ टक्के म्हणजे ६१६ दलघमी पाणी आहे. जुलै २०१५ पर्यंतची पिण्याच्या पाण्याची गरज, औद्योगिक पाणी वापर आणि होणारे बाष्पीभवन यासाठी ४८० दलघमी पाणी लागणार आहे. यंदा माजलगाव धरणात पाणी राहिलेले नाही.