शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

स्कूल बसचालकांना १४ महिन्यांपासून नाही काम; काहीजण विकतात भाजीपाला तर काही करतात मिळेल ते काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:03 IST

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे स्कूलबसचे स्टेअरिंग आणि चाके जाम असून, १४ महिन्यांपासून चालकांना काम नसल्याने कोणी भाजीपाला विकत आहे, ...

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे स्कूलबसचे स्टेअरिंग आणि चाके जाम असून, १४ महिन्यांपासून चालकांना काम नसल्याने कोणी भाजीपाला विकत आहे, तर कोणी मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. शहरातील स्कूलबस असलेल्या जवळपास १००० पेक्षा अधिक शाळा असून, जवळपास १४ हजार मुलांची दररोज ने-आण केली जात होती. २००० स्कूलबसवर २००० चालकांच्या कुटुंबाचा भार होता. परंतु कोरोना महामारीने सर्वांच्या आशा-आकांक्षावर पाणी फिरले आहे. १४ महिन्यांचा वनवास शाळेत विद्यार्थी ने-आण करणाऱ्यांवर आला आहे. एकही गाडी रस्त्यावर फिरताना दिसली नाही. मध्यंतरी शाळा सुरू झाल्याची घोषणा झाली आणि पुन्हा लॉकडाऊन झाले, काही वाहनचालकांनी आपली वाहने बाहेरही काढली नाहीत. परंतु बँक व वित्त संस्थांचा कर्जवसुलीसाठी तगादा सुरू झाला. हीच मोठी डोकेदुखी नागरिकांना सहन करावी लागली. अजून अशी अवस्था किती दिवस राहणार, पोट भरण्यासाठी चालक आणि बस मालकांची तारेवरची कसरत सुरू झाली आहे.

- १३६९० मुले स्कूलबसने दररोज प्रवास करत होती.

- २००० स्कूल बस

- २००० चालक

मागण्या...

- लॉकडाऊन काळात वित्त संस्था, बँकांकडून कर्जाच्या हप्त्यांची वसुली थांबवावी.

- शाळा सुरू झाल्यावर नियमाप्रमाणे त्यांचे ऋण फेडण्यास तयार आहोत.

- शासनाने कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल अशा स्थितीत पॅकेज घोषित करावे.

- कर्ज फेडण्यासाठी मुदतवाढ द्यावी.

- पाल्यांच्या शाळेची फी माफ करावी.

चालकांच्या प्रतिक्रिया...

भाजीपाला विकावा लागतो...

स्कूलचा चालक आणि मालक असूनदेखील शाळाच बंद असल्याने बस उभ्याच आहेत. त्या चालविण्याची परवानगीच नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या काळात फक्त तोच व्यवसाय सुरू आहे.

- शेख नाजेर पटेल

मिळेल ते काम करतो...

बस बंद असल्याने खासगी कारखान्यात मिळेल ते रोजंदारीवर काम करण्यासाठी जात आहे. त्यातून कुटुंबाला सहारा मिळत आहे. आठवड्यातून नियमित हाताला कामदेखील मिळत नाही.

- शांताराम खरात

रिक्षा चालवीत आहे...

शाळा बंद असल्याने बस बंद असल्याने मुलांना सोडण्याचा प्रश्नच नाही. काम नसल्याने आता रिक्षा चालीवत आहे. शहरात रिक्षालादेखील दोन प्रवाशांची परवानगी आहे. कोरोनाचे नियम पाळूनच रस्त्यावर वाहन चालवावे लागत आहे.

- प्रकाश तरटे

मजुरीशिवाय पर्याय नाही..

मजुरी काम करताना एका ठेकेदाराकडे काम नियमित मिळेल हे सांगता येत नाही. परंतु जीवनाचा गाडा चालविण्यासाठी अंगमेहनतीचे काम करावे लागत आहे. कारखान्यातदेखील काम मिळत नाही, मग मोलमजुरीशिवाय पर्याय नाही.

- भगवान दांडगे

(स्टार ७२८ डमी)