शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सव्वादोन वर्षामध्ये साडेतीनशे शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By admin | Updated: March 10, 2017 00:30 IST

उस्मानाबाद : दुष्काळ, नापिकी आणि डोक्यावरील कर्जाचा बोझा काही केल्या हलका होत नसल्याने मागील सव्वादोन वर्षात ३५२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

उस्मानाबाद : दुष्काळ, नापिकी आणि डोक्यावरील कर्जाचा बोझा काही केल्या हलका होत नसल्याने मागील सव्वादोन वर्षात थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ३५२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. दर दोन ते अडीच दिवसाला एक शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाकडून पॅकेज जाहीर करण्यात आले. परंतु, तातडीने अंमलबजावणी करण्याचे सोडून केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच की काय, शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. हे विदारक चित्र लक्षात घेऊन तरी शासनाने ठोस पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्हा व परिसरात मागील काही वर्षापासून अवेळी व अपुऱ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ खरीप या प्रमुख हंगामासह रबीतील पिकेही शेतकऱ्यांच्या हाती लागलेली नाहीत़ त्यातच जिल्हा बँक डबघाईला आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक पतपुरवठा बंद पडला आहे़ राष्ट्रीयकृत बँका कर्जपुरवठा करीत नसल्याने शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून कर्ज घ्यायची वेळ आली़ खासगी सावकारांच्या कर्जाचा डोंगर, दुष्काळ, सततच्या नापिकीमुळे हाती न पडणारे उत्पन्न, मुला-मुलींच्या लग्नासह शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च अशा एक ना आनेक कारणांनी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे़ सन २०१५ मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक १६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ राज्यातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचे नाव नोंदले गेले होते. त्यानंतर सन २०१६ मध्येही १६१ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली़ शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी शासनाने बळीराजा चेतना अभियानासह इतर शासकीय उपाययोजना राबविल्या़ मोफत शेतीउपयोगी साहित्य वाटपासह रोखीने काही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आली़गतवर्षी परतीच्या पावसाने तीन वर्षाचा दुष्काळ वाहून गेला़ जिल्ह्यातील लहान-मोठे सर्वच प्रकल्प तुडंूंब भरले. खरिपातील पिके काढण्याच्या कालावधीतच दमदार पाऊस झाल्याने सोयाबीनसह इतर पिकांचे अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही़ जे काही हाती लागले, त्याला बाजारपेठेत अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले होते. या संकटानेही न डगमगता शेतकऱ्यांनी रबी रबीची पेरणी केली. परंतु, शेतीमाल बाजारपेठेत येताच दरामध्ये झपाट्याने घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर काही केल्या कमी होत नाही. या सर्व कारणामुळे शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलित आहेत. चालू वर्षात आजवर २७ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. यापैकी केवळ दहा प्रकरणेच शासनाकडून मंजूर करण्यात आली आहेत. त्यांना आर्थिक मदतही देण्यात आली आहे. तर पाच प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. बारा प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे़ २ कोटी १६ लाखाची मदतमागील सव्वादोन वर्षात दाखल प्रस्तावांपैकी २६० प्रस्तावांना प्रशासनाने मंजुरी देऊन २ कोटी १६ लाखाची मदत दिली आहे़ यात सन २०१५ मध्ये ९८ प्रकरणे मंजूर करून ९८ लाखांची, २०१६ मध्ये १०८ प्रकरणे मंजूर करून १ कोटी ८ लाखांची तर चालू वर्षात १० प्रकरणे मंजूर करून १० लाखाची मदत संबंधित मयत शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यात आली आहे़ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे़(प्रतिनिधी)