शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

सव्वादोन वर्षामध्ये साडेतीनशे शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By admin | Updated: March 10, 2017 00:30 IST

उस्मानाबाद : दुष्काळ, नापिकी आणि डोक्यावरील कर्जाचा बोझा काही केल्या हलका होत नसल्याने मागील सव्वादोन वर्षात ३५२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

उस्मानाबाद : दुष्काळ, नापिकी आणि डोक्यावरील कर्जाचा बोझा काही केल्या हलका होत नसल्याने मागील सव्वादोन वर्षात थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ३५२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. दर दोन ते अडीच दिवसाला एक शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाकडून पॅकेज जाहीर करण्यात आले. परंतु, तातडीने अंमलबजावणी करण्याचे सोडून केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच की काय, शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. हे विदारक चित्र लक्षात घेऊन तरी शासनाने ठोस पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्हा व परिसरात मागील काही वर्षापासून अवेळी व अपुऱ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ खरीप या प्रमुख हंगामासह रबीतील पिकेही शेतकऱ्यांच्या हाती लागलेली नाहीत़ त्यातच जिल्हा बँक डबघाईला आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक पतपुरवठा बंद पडला आहे़ राष्ट्रीयकृत बँका कर्जपुरवठा करीत नसल्याने शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून कर्ज घ्यायची वेळ आली़ खासगी सावकारांच्या कर्जाचा डोंगर, दुष्काळ, सततच्या नापिकीमुळे हाती न पडणारे उत्पन्न, मुला-मुलींच्या लग्नासह शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च अशा एक ना आनेक कारणांनी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे़ सन २०१५ मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक १६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ राज्यातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचे नाव नोंदले गेले होते. त्यानंतर सन २०१६ मध्येही १६१ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली़ शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी शासनाने बळीराजा चेतना अभियानासह इतर शासकीय उपाययोजना राबविल्या़ मोफत शेतीउपयोगी साहित्य वाटपासह रोखीने काही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आली़गतवर्षी परतीच्या पावसाने तीन वर्षाचा दुष्काळ वाहून गेला़ जिल्ह्यातील लहान-मोठे सर्वच प्रकल्प तुडंूंब भरले. खरिपातील पिके काढण्याच्या कालावधीतच दमदार पाऊस झाल्याने सोयाबीनसह इतर पिकांचे अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही़ जे काही हाती लागले, त्याला बाजारपेठेत अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले होते. या संकटानेही न डगमगता शेतकऱ्यांनी रबी रबीची पेरणी केली. परंतु, शेतीमाल बाजारपेठेत येताच दरामध्ये झपाट्याने घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर काही केल्या कमी होत नाही. या सर्व कारणामुळे शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलित आहेत. चालू वर्षात आजवर २७ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. यापैकी केवळ दहा प्रकरणेच शासनाकडून मंजूर करण्यात आली आहेत. त्यांना आर्थिक मदतही देण्यात आली आहे. तर पाच प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. बारा प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे़ २ कोटी १६ लाखाची मदतमागील सव्वादोन वर्षात दाखल प्रस्तावांपैकी २६० प्रस्तावांना प्रशासनाने मंजुरी देऊन २ कोटी १६ लाखाची मदत दिली आहे़ यात सन २०१५ मध्ये ९८ प्रकरणे मंजूर करून ९८ लाखांची, २०१६ मध्ये १०८ प्रकरणे मंजूर करून १ कोटी ८ लाखांची तर चालू वर्षात १० प्रकरणे मंजूर करून १० लाखाची मदत संबंधित मयत शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यात आली आहे़ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे़(प्रतिनिधी)