शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
2
"मी जर टॅरिफ लावला नसता, तर भारताने कधीच..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टॅरिफची 'वकिली'
3
"आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार
4
चीनची बाजी, परंतु भारतच खरा 'किंग'; 'या' दिग्गजाला आपल्यावर इतका का भरवसा?
5
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
6
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना कोणी सांगितले? काय लाभ झाला?
7
झोमॅटोचा झटका! सणासुदीत प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ; आता प्रत्येक ऑर्डरवर इतके रुपये मोजावे लागणार
8
नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?
9
नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..."
10
वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले
11
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
12
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
13
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
14
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
15
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
16
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
17
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
18
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
19
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
20
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल

‘पाणी साठवा, गाव वाचवा’ अभियान राहिले कागदावरच

By admin | Updated: August 22, 2014 00:58 IST

परंडा : भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ हे अभियान सुरू केले असून, यात लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने तालुक्यातील

परंडा : भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ हे अभियान सुरू केले असून, यात लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने तालुक्यातील पाच ग्रामपांयतींची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेला आता तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असला तरी लघु पाटबंधारे विभागाने मात्र निवड झालेल्या ग्रामपंचायतींना अद्याप साधी कल्पनाही दिलेली नाही. त्यामुळे हे अभियान केवळ कागदावरच राहिल्याचे दिसत आहे. जून महिन्यात सुरू झालेले हे अभियान १५ आॅक्टोबरपर्यंत राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या अभियानातंर्गत भूजल पातळी सर्वेक्षण व परिक्षण करणे, परिसरात पर्जन्यमापक यंत्र बसवून पावसाची नोंद करणे, तंत्रशुद्ध पद्धत्तीने वॉटर अकाऊंट करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे, शासकीय-निमशासकीय, खाजगी, इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टींग उभारण्यासाठी प्रत्येक कुटूंबप्रमूख, बचतगटातील महिलांना प्रवृत्त करणे, पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जागोजागी उतारात चर खोदणे, नादुरुस्त तलाव, विहिरी शेततळयांमधील गाळ काढून जलसंचय करणे, भूगर्भस्तर आणि भूजल पातळीच्या क्षमतेनुसार ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचे मुल्यमापन करुन या स्पर्धेत सहभागी व्हावयाचे आहे. या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या योजनेत लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने निवड झालेल्या ग्रामपंचयातीमध्ये स्पर्धा लावण्यात आल्या असून, पात्र ग्रामपंचायतींचा शासनाकडून गौरवही होणार आहे. या अभियानासाठी तालुक्यातील जवळा (नि), भांडगाव, पांढरेवाडी, साकत (बु) आणि मुगाव पाच पाच ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. मात्र, अभियानाचा कालावधी सुरू होऊन अडीच महिने झाले तरी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने अद्याप या ग्रामपंचायतींशी साधा संपर्कही साधला नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या पाचही गावात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे हे अभियान योग्य वेळेत सुरू झाले असते तर टंचाई काळात ग्रामस्थांना याचा फायदा झाला असता. (वार्ताहर)