शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
2
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
3
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
4
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
5
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
6
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
7
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
8
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
9
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
10
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
11
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
12
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
13
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
14
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
15
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
16
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
17
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
18
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

चारा छावण्यांना सरपंचांनी भेटी द्याव्यात

By admin | Updated: December 9, 2015 00:40 IST

उस्मानाबाद : सध्या जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. चाऱ्यासोबतच पाण्याचेही दुर्भीक्ष्य निर्माण झाले आहे.

उस्मानाबाद : सध्या जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. चाऱ्यासोबतच पाण्याचेही दुर्भीक्ष्य निर्माण झाले आहे. जिल्हाभरात उद्भवलेली चाराटंचाई लक्षात घेऊन ५१ छावण्यांना मंजूरी दिली आहे. यापैकी १६ छावण्या सुरू झाल्या आहेत. छावण्या चालकांकडून व्यवस्थितरित्या सोयी-सुविधा ुपुरविल्या जातात की नाही? हे पाहण्यासाठी त्या-त्या भागातील सरपंचांनीही चारा छावण्यांना भेटी द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर लोकमाहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन मंगळवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, टाटा सामाजिक संस्थेचे डॉ. अब्दुल शाबान, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांची प्रमुख उपस्थिती होती. दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने शासन विविध उपाययोजना करीत आहे. यासाठी विविध योजना सुरूही केल्या आहेत. या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी जनजागृती आवश्यक आहे. अशा लोकमाहिती अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होते, असे डॉ. नारनवरे यांनी नमूद केले. सरपंच शासनाचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे सरपंचांनी पंचसूत्रीची (जलयुक्त शिवार, चारा, पाणी, हाताला काम, घरापर्यंत धान्य पोहोचविणे) काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सध्या पाण्यासोबतच चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांची उपासमार होऊ नये, यासाठी ५१ छावण्यांना मंजुरी दिली आहे. यापैकी १६ छावण्या सुरू झाल्या आहेत. या छावण्यातून शासन निकषानुसार सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. छावण्या चालकांकडून हे निकष पाळले जातात की नाही, हे पाहणे गरजेचे आहे. यासाठी सरपंचांनीही छावण्यांना भेटी देऊन निकषांची पूर्तता होते की नाही? हे पाहिले पाहिजे. निकषांची पूर्तता होत नसेल तर प्रशासनाला कल्पना द्या, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी रायते यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविल्या जातील, असे सांगत, टंचाई निवारणार्थ सुरू केलेल्या योजना पूर्ण क्षमतेने राबवू, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनीही मनोगत व्यक्त केले. शासनाच्या योजनांची जनजागृती झाल्याशिवाय त्याचा सर्वसामान्यांना लाभ होणार नाही, त्यामुळे लोकमाहिती अभियानासारखे कार्यक्रम अधिकाधिक प्रमाणात व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी इतर मान्यवरांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)