शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

पाऊस नसल्याने बळीराजा चिंतित

By admin | Updated: June 19, 2014 00:16 IST

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव परिसरातील शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत.

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव परिसरातील शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. मान्सून सुरू होऊन आठवडा लोटला तरी अद्यापही पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी केले आहे. असे असले तरी पाऊस न पडल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.कोळगावसह परिसरातील काजळा, तांदळा, साठेवाडी, खडकी, टाकळगव्हाण, काळेवाडी, माणकापूर , सावरगाव या परिसरातील शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच नांगरणी, पाळी, मोगडा आदी कामे केली होती. तर १ जून लागताच अनेक शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदीही केली आहे. असे असले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात असल्याचे अ‍ॅड. उद्धव रासकर यांनी सांगितले. या परिसरातील शेतकऱ्यांनी शेत मशागतीसह बियाणांवर मोठा खर्च केला आहे. यामुळे वेळेवर पेरणी होणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यातून सांगण्यात येते. मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास उत्पादन चांगल्या प्रकारे होते. तसेच पिकांवर रोगराईही पडत नाही व दुबार पीक घेण्यास शेतकऱ्यांना सोपे जात असल्याचे पोखरी येथील सुनील धस यांनी सांगितले. या परिसरातील काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनद्वारे कपाशीची लागवड केली आहे. ठिबक सिंचन करण्यास शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला होता. शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी असल्यामुळे त्यांनी कपाशी लावलेली आहे. मात्र आता पाऊसच न पडल्याने विहिरींची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. यामुळे ठिबक सिंचनद्वारे कपाशीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही पावसाची प्रतिक्षा आहे.सलग दोन वर्षांपासून या परिसरात उशिराने पाऊस पडत असल्याने याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. या वर्षीही वेळेवर पाऊस न पडल्यास पेरणीसाठी अडचण येईल, असे शेतकरी बाळू जोगदंड म्हणाले. (वार्ताहर)ठिबक सिंचन केलेले शेतकरीही अडचणीतकोळगाव परिसरातील काही शेतकऱ्यांनी ठिबकवर कपाशी लावली आहे. पाऊस न पडल्याने हे शेतकरीही अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.मशागती पूर्ण झाल्या असतानाही पावसाअभावी पेरण्या रखडल्या.वेळेवर पेरणी न झाल्यास उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना चिंता.