शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

पाऊस नसल्याने बळीराजा चिंतित

By admin | Updated: June 19, 2014 00:16 IST

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव परिसरातील शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत.

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव परिसरातील शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. मान्सून सुरू होऊन आठवडा लोटला तरी अद्यापही पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी केले आहे. असे असले तरी पाऊस न पडल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.कोळगावसह परिसरातील काजळा, तांदळा, साठेवाडी, खडकी, टाकळगव्हाण, काळेवाडी, माणकापूर , सावरगाव या परिसरातील शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच नांगरणी, पाळी, मोगडा आदी कामे केली होती. तर १ जून लागताच अनेक शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदीही केली आहे. असे असले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात असल्याचे अ‍ॅड. उद्धव रासकर यांनी सांगितले. या परिसरातील शेतकऱ्यांनी शेत मशागतीसह बियाणांवर मोठा खर्च केला आहे. यामुळे वेळेवर पेरणी होणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यातून सांगण्यात येते. मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास उत्पादन चांगल्या प्रकारे होते. तसेच पिकांवर रोगराईही पडत नाही व दुबार पीक घेण्यास शेतकऱ्यांना सोपे जात असल्याचे पोखरी येथील सुनील धस यांनी सांगितले. या परिसरातील काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनद्वारे कपाशीची लागवड केली आहे. ठिबक सिंचन करण्यास शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला होता. शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी असल्यामुळे त्यांनी कपाशी लावलेली आहे. मात्र आता पाऊसच न पडल्याने विहिरींची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. यामुळे ठिबक सिंचनद्वारे कपाशीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही पावसाची प्रतिक्षा आहे.सलग दोन वर्षांपासून या परिसरात उशिराने पाऊस पडत असल्याने याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. या वर्षीही वेळेवर पाऊस न पडल्यास पेरणीसाठी अडचण येईल, असे शेतकरी बाळू जोगदंड म्हणाले. (वार्ताहर)ठिबक सिंचन केलेले शेतकरीही अडचणीतकोळगाव परिसरातील काही शेतकऱ्यांनी ठिबकवर कपाशी लावली आहे. पाऊस न पडल्याने हे शेतकरीही अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.मशागती पूर्ण झाल्या असतानाही पावसाअभावी पेरण्या रखडल्या.वेळेवर पेरणी न झाल्यास उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना चिंता.