जालना : तालुक्यातील सुमारे १८ हजार निराधारांच्या अनुदानापोटी साडेचार कोटींची रक्कम ५७ बँकांमध्ये जमा झाली असून प्रत्येक निराधारास जानेवारी ते मार्च २०१४ या तीन महिन्यांचे अनुदान वितरित करण्यात येणार असल्याची तहसीलदार जे.डी. वळवी यांनी दिली.जालना शहरात संजय गांधी निराधार योजनेचे एकूण ५ हजार ६११ तर श्रावण बाळ योजनेचे ११ हजार ६८४ लाभार्थी आहेत. संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ३७ बँकांमध्ये १ कोटी ९५ लाख ४० हजार ६०० रुपये अनुदान जमा करण्यात आले. तर श्रावण बाळ योजनेसाठी शहरातील लाभार्थ्यांसाठी २ कोटी ७५ लाख ६७ हजार ८०० रुपये जमा करण्यात आले. ग्रामीण भागात संजय गांधी निराधार योजनेचे १६७८ तर श्रावण बाळ योजनेचे ६४१७ लाभार्थी आहेत. त्यासाठी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे ८५ लाख २२ हजार ८०० ४ बँकांमध्ये व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे १ कोटी २५ लाख ५५ हजार रुपये १६ बँकांमध्ये जमा करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
निराधारांसाठी साडेचार कोटींचे अनुदान जमा
By admin | Updated: June 18, 2014 01:46 IST