शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

रिक्षा परवडतेय; पण मीटरच पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:05 IST

बापू सोळुंके औरंगाबाद : इंधन दरवाढीमुळे नागरिकांचा स्वतंत्र वाहन वापरण्याऐवजी रिक्षा वापरण्याकडे कल दिसून येत असला तरी रिक्षात मीटरने ...

बापू सोळुंके

औरंगाबाद : इंधन दरवाढीमुळे नागरिकांचा स्वतंत्र वाहन वापरण्याऐवजी रिक्षा वापरण्याकडे कल दिसून येत असला तरी रिक्षात मीटरने प्रवास करायचा झाल्यास मीटरच बंद असल्याचे दिसून येते. शहरात आणि ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानाधारक ७० ते ८० टक्के रिक्षांचे मीटर बंद पडले आहेत. उर्वरित रिक्षांचे मीटर गायब झाले आहेत.

औरंगाबाद शहरात प्रवासी वाहतूक करण्यासाठी २५ हजार परवानाधारक रिक्षा आहेत. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसवर या रिक्षा चालतात. वर्षभरापासून या सर्व इंधनाचे दर सतत वाढत आहेत. इंधनाचे दर आणि महागाईनुसार शासनाकडून रिक्षाच्या मीटरचे भाडे ठरवून देण्यात येते. मात्र, सात ते आठ वर्षांपासून रिक्षा प्रवास भाडे दर निश्चित करण्यासाठी परिवहन आयुक्तांना वेळच मिळाला नाही. परिणामी रिक्षाचालकांनी इलेक्ट्रॉनिक मीटरऐवजी ठरावीक दराने प्रवासी वाहतूक करण्यास सुरुवात केली.

परवानाधारक रिक्षाचे दरवर्षी आरटीओ अधिकाऱ्यामार्फत परीक्षण करून फिटनेस प्रमाणपत्र घेणे रिक्षामालकास बंधनकारक आहे. चालू स्थितीत मीटर असल्याशिवाय आरटीओ अधिकारी रिक्षाची पासिंग (परवाना) करीत नाही. ही बाब लक्षात घेऊन आरटीओकडे रिक्षा पासिंगसाठी नेण्यापूर्वी मीटर सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतात. वर्षभर मीटरनुसार एकाही प्रवाशाला भाडे न आकारणारे रिक्षाचालक मीटर चालू स्थितीत आणण्यासाठी मेकॅनिककडे चारशे ते पाचशे रुपये खर्च करतात. रिक्षाची पासिंग होताच बहुतेक रिक्षाचालक मीटर काढून ठेवतात. ही बाब आरटीओ अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. असे असले तरी दरपत्रक निश्चित न झाल्यामुळे आरटीओ प्रशासनही रिक्षाचालकांना मीटरवर प्रवासी वाहतूक करण्यासाठी बंधन घालत नाही.

–-----–------------------

चौकट

मीटर बंद असल्याचे येते उत्तर

एखादा प्रवासी मीटरनुसार प्रवास भाडे आकारायला सांगतो तेव्हा रिक्षाचालक मीटर बंद असल्याचे उत्तर देतो. परिणामी प्रवाशाला रिक्षाचालक सांगेल तेवढे पैसे मोजून प्रवास करावा लागतो.