शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रिक्षा परवडतेय; पण मीटरच पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:05 IST

बापू सोळुंके औरंगाबाद : इंधन दरवाढीमुळे नागरिकांचा स्वतंत्र वाहन वापरण्याऐवजी रिक्षा वापरण्याकडे कल दिसून येत असला तरी रिक्षात मीटरने ...

बापू सोळुंके

औरंगाबाद : इंधन दरवाढीमुळे नागरिकांचा स्वतंत्र वाहन वापरण्याऐवजी रिक्षा वापरण्याकडे कल दिसून येत असला तरी रिक्षात मीटरने प्रवास करायचा झाल्यास मीटरच बंद असल्याचे दिसून येते. शहरात आणि ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानाधारक ७० ते ८० टक्के रिक्षांचे मीटर बंद पडले आहेत. उर्वरित रिक्षांचे मीटर गायब झाले आहेत.

औरंगाबाद शहरात प्रवासी वाहतूक करण्यासाठी २५ हजार परवानाधारक रिक्षा आहेत. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसवर या रिक्षा चालतात. वर्षभरापासून या सर्व इंधनाचे दर सतत वाढत आहेत. इंधनाचे दर आणि महागाईनुसार शासनाकडून रिक्षाच्या मीटरचे भाडे ठरवून देण्यात येते. मात्र, सात ते आठ वर्षांपासून रिक्षा प्रवास भाडे दर निश्चित करण्यासाठी परिवहन आयुक्तांना वेळच मिळाला नाही. परिणामी रिक्षाचालकांनी इलेक्ट्रॉनिक मीटरऐवजी ठरावीक दराने प्रवासी वाहतूक करण्यास सुरुवात केली.

परवानाधारक रिक्षाचे दरवर्षी आरटीओ अधिकाऱ्यामार्फत परीक्षण करून फिटनेस प्रमाणपत्र घेणे रिक्षामालकास बंधनकारक आहे. चालू स्थितीत मीटर असल्याशिवाय आरटीओ अधिकारी रिक्षाची पासिंग (परवाना) करीत नाही. ही बाब लक्षात घेऊन आरटीओकडे रिक्षा पासिंगसाठी नेण्यापूर्वी मीटर सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतात. वर्षभर मीटरनुसार एकाही प्रवाशाला भाडे न आकारणारे रिक्षाचालक मीटर चालू स्थितीत आणण्यासाठी मेकॅनिककडे चारशे ते पाचशे रुपये खर्च करतात. रिक्षाची पासिंग होताच बहुतेक रिक्षाचालक मीटर काढून ठेवतात. ही बाब आरटीओ अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. असे असले तरी दरपत्रक निश्चित न झाल्यामुळे आरटीओ प्रशासनही रिक्षाचालकांना मीटरवर प्रवासी वाहतूक करण्यासाठी बंधन घालत नाही.

–-----–------------------

चौकट

मीटर बंद असल्याचे येते उत्तर

एखादा प्रवासी मीटरनुसार प्रवास भाडे आकारायला सांगतो तेव्हा रिक्षाचालक मीटर बंद असल्याचे उत्तर देतो. परिणामी प्रवाशाला रिक्षाचालक सांगेल तेवढे पैसे मोजून प्रवास करावा लागतो.