शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

हगणदारीमुक्तीचा संकल्प

By admin | Updated: December 21, 2014 00:17 IST

औरंगाबाद : पाटोदा- गंगापूर नेहरी हगणदारीमुक्त झाले. अनेक पुरस्कार प्राप्त करीत ही ग्रामपंचायत एक आदर्श मॉडेल ठरली. परंतु आता आपणास बाहेर पडायलाच हवे.

औरंगाबाद : पाटोदा- गंगापूर नेहरी हगणदारीमुक्त झाले. अनेक पुरस्कार प्राप्त करीत ही ग्रामपंचायत एक आदर्श मॉडेल ठरली. परंतु आता आपणास बाहेर पडायलाच हवे. यापुढे आपले पाऊल गंगापूर तालुका पुढील वर्षभरात हगणदारीमुक्तीच्या दिशेने पडणार आहे, असा संकल्प पाटोदा- गंगापूर नेहरी आदर्श ग्रामपंचायतीचे शिल्पकार भास्कर पेरे पाटील यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनी शनिवारी सोडला. गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त गंगापूर तालुक्यातील ग्रामसेवकांचा मेळावा त्यांनी पाटोदा येथे आयोजित केला होता. या मेळाव्याचे प्रास्ताविक करताना पेरे म्हणाले, एक गाव आदर्श करून थांबावे काय, असा विचार मनात घोळत होता. परंतु त्यानंतर सर्व तालुक्यासाठीच काम करण्याचा निर्णय मी घेतला. यासाठी जवळपास दीडशेहून अधिक अधिकारी, कर्मचारी, नागरिकांशी विचारविनिमय केला. हे कार्य सिद्धीस नेण्यात सर्वात महत्त्वाचा घटक हा ग्रामसेवक आहे. ग्रामसेवकाने मनावर घेतले तर तालुक्याचे चित्र सहज पालटू शकते. एक गाव हगणदारीमुक्त करताना किती अडचणी येतात, हे मला ठाऊक आहे. त्यामुळे तालुका हगणदारीमुक्त करणे किती अवघड आहे, याची मला कल्पना असली तरी, अशक्य मात्र नाही, हेदेखील तेवढेच खरे आहे. यावेळी गंगापूर तालुक्याचे पंचायत समिती सभापती संजीव जैस्वाल, माजी जि. प. सदस्य अप्पासाहेब गावंडे, पं. स. सदस्य कृष्णा सुकासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक अशोक कदम, प्रा. प्रशांत पाटील अवसरमल, अ‍ॅड. आनंद खवले, गुरूदेव सेवा मंडळाचे अ‍ॅड. मनीष शर्मा, पाटोद्याचे सरपंच दत्तात्रय शहाणे, उपसरपंच हरिश्चंद्र मानकर आदींची उपस्थिती होती. ग्रामविकास अधिकारी आर. डी. चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. गटविकास अधिकारी एन. एम. वाघ यांनी आभार मानले. पाण्याचे एटीएम ठरले आकर्षणप्रशासनातील ज्येष्ठ अधिकारी, ग्रामसेवक आणि निवडक राजकीय कार्यकर्त्यांना या संकल्प मेळाव्यासाठी पाटोदा येथे निमंत्रित करण्यात आले होते. हा मेळावा संपल्यानंतर ग्रामसेवकांनी गावात फिरून पाहणी केली. बहुतांश सर्वांचीच पावले थबकली कै. बालचंद पाटील पेरे जलशुद्धीकरण केंद्रासमोर. ग्रामपंचायत पातळीवर सुरू झालेले हे तसे पहिलेच जलशुद्धीकरण केंद्र. या शुद्धीकरण केंद्रावरून नागरिकांना शुद्ध पाणी नेता येते. परंतु त्यासाठी पैसे मोजावे लागतात, तेही अ‍ॅडव्हान्समध्ये. ग्रामपंचायतीने त्यासाठी प्रीपेड कार्डची अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे. १०० रुपये भरून ग्रामपंचायत ग्रामस्थांना एक एटीएमसारखे कार्ड देते. हे कार्ड मशीनमध्ये स्वॅप केले की, १० लिटरची एक कॅन भरून शुद्ध पाणी मिळते. कार्डचे पैसे संपले की, पाणी बंद होते. २० लिटर क्षमतेच्या ३५० बॉटल पाणी या केंद्रात दररोज शुद्ध होते. ५ रुपयांप्रमाणे ही बॉटल विक्री होते. त्यातून दररोज १७५० रुपयांची अमदानी ग्रामपंचायतीला होते.