शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आरक्षण निर्णयाचे जिल्हाभरात स्वागत

By admin | Updated: June 28, 2014 01:16 IST

उस्मानाबाद : राज्य मंत्रीमंडळाने शिक्षण व नोकरीत मराठा समाजाला १६ तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे़

उस्मानाबाद : राज्य मंत्रीमंडळाने शिक्षण व नोकरीत मराठा समाजाला १६ तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्य शासनाच्या या निर्णयाचे गुरूवारी जिल्हाभरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले़ ठिकठिकाणी फटाके फोडून तसेच पेठे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला़मराठा आरक्षण कृती समितीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला़ यावेळी विजय पवार, कैलास काकडे, रोहित बागल, मयुर काकडे, अभिजित देशमुख, ओम नाईकवाडी, पंकज पाटील, आशिष पाटील, अग्निवेश शिंदे, जयराज खोचरे, चंद्रजित जाधव, भारत कोकाटे, भारत इंगळे, अनंत जगताप, सुरज साळुंके, गजानन काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर, उमेश राजेनिंबाळकर, अभिषेक बागल, सुमित बागल, राहुल बागल, बालाजी साळुंके, नाना घाडगे आदी उपस्थित होते़साखरेचे वाटपमहिला कृती समितीच्या वतीने साखर वाटून जल्लोष करण्यात आला़ यावेळी शामल वडणे, शीला उंबरे, सविता कोरे, नंदा पुनगुडे, वर्षा कोळगे, ज्योति सपाटे, सुनिता शिंदे, तारामती मोरे, कलावती काळे, उमरावती भोसले आदी महिला पदाधिकारी, युवक उपस्थित होते़राष्ट्रवादीकडून स्वागतआघाडी शासनाने इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षण दिल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले़ यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर, नगराध्यक्षा रेविता बनसोडे, उपनगराध्यक्ष अमित शिंदे, पालिका गटनेते मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते़मुस्लिम आरक्षण कृती समितीमराठा, मुस्लिम समाजास शासनाने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयाचे मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले़ यावेळी मशायक समीयोद्दीन, कादरखाँ पठाण, गफार काझी, मैनूद्दीन पठाण, निहाल काझी, इलियास पिरजादे, आलीम मौलाना, पाशा पठाण, शाहाजान शिकलगार, सादिक शेख, खलील सय्यद, खलीफा कुरेशी, बिलाल तांबोळी, सलीम शेख, गयास शेख, इब्राहीम शेख, अ‍ॅड़उमर मोरवे, अनवर शेख आदी उपस्थित होते़कळंब शहरात रॅलीमराठा, मुस्लिम समाजास आरक्षण देण्याचा निर्णय झाल्याबद्दल कळंब शहरात मोठ्या जल्लोषात रॅली काढण्यात आली़ यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे, प्रवक्ते अतुल गायकवाड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष सागर बाराते, उपजिल्हाध्यक्ष बालाजी सुरवसे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश धस, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण टेकाळे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गिड्डे, कृष्णा भाकरे, शिवाजी कराळे, सुरेश गायकवाड, दत्ता तनपुरे, मुस्लिम बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक मिर्झा, शुभम राखुंडे, विनोद यादव, अविनाश शिंदे, सनी बोरगे, आकाश चोंदे आदी युवक उपस्थित होते़ दरम्यान, येथील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रामहारी शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब जाधवर, विजयेंद्र चव्हाण, अशोकभाऊ शिंदे, नगर परिषदेतील गटनेते प्रा. श्रीधर भवर, नगरसेवक संजय मुंदडा, युवक तालुकाध्यक्ष अरुण चौधरी, बाजार समिती संचालक प्रणव चव्हाण, माजी जि. प. उपाध्यक्ष भारत खोसे, तारेख मिर्झा, सतीश टेकाळे, उत्तम टेकाळे आदींची उपस्थिती होती.छावा संघटनातुळजापूर- महाराष्ट्र शासनाने मराठ्यांना आरक्षण जाहीर केल्यामुळे कै. आण्णासाहेब जावळे पाटील यांची स्वप्नपूर्ती झाली. त्यामुळे अ. भा. छावा संघटनेने केलेल्या कामाची पावती मिळाल्याने भारतीय छावा संघटनेच्या वतीने तुळजापुरात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी जीवनराज इंगळे, महेश गवळी, औदुंबर जामदाडे, कुमार टोले, प्रशांत अपराध अण्णासाहेब क्षीरसागर, प्रशांत इंगळे, दादा भोसले, सोनबा भालेकर, बालाजी टोले, तात्या क्षीरसागर, दत्ता सोमाजी, महेश कापसे, संतोष नाईकवाडी, ओमकार हंगरगेकर, सुहास गायकवाड, लखन शिंदे, राम छत्रे, देवेंद्र औटी, आबा कापसे, आप्पा चोपदार, विशाल कदम, अतूल टोले आदींची उपस्थिती होती. जिल्हा काँग्रेस कमिटीतुळजापूर- राज्य सरकारने मराठा समाजास १६ टक्के तसेच मुस्लिम समाजास ५ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी स्वागत केले आहे.