शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

उर्दू साहित्यामध्ये राष्ट्रीय एकतेचे प्रतिबिंब, चर्चासत्र उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST

मौलाना आझाद महाविद्यालय, क्रेसेंट सोसायटी औरंगाबादच्या वतीने सोमवारी ‘उर्दू साहित्यामध्ये राष्ट्रीय एकतेचे प्रतिबिंब’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र घेण्यात ...

मौलाना आझाद महाविद्यालय, क्रेसेंट सोसायटी औरंगाबादच्या वतीने सोमवारी ‘उर्दू साहित्यामध्ये राष्ट्रीय एकतेचे प्रतिबिंब’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र घेण्यात आले. अध्यक्षीय भाषणात खान पुढे म्हणाले की, ८०० वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेतला तर उर्दू भाषेची निर्मिती भारतात झाली आणि या भाषेचा मूळ गाभा अनेक भाषा आहेत. हिंदी, संस्कृत, मराठी, अरबी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, फारसी शब्दांपासून उर्दूचा जन्म झाला.

ऑल इंडिया रेडिओचे माजी प्रसारक खान मुखीम खान यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी उर्दू ही प्रेमाची भाषा असून, अनेक शतकांपासून मुस्लिम साहित्यिकांनी हिंदू संस्कृतीबद्दल आपल्या काव्यरचना व साहित्यातून विचार मांडले. उर्दू हे केवळ प्रेमाची भाषा नव्हे तर मानवाला मानवाशी जोडणारी भाषा आहे. प्रमुख वक्ते डॉ. मिर्झा मो. खिझर बेग यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामागील राष्ट्रीय भावनेच्या तत्त्वांमुळे कशाप्रकारे आपणास स्वतंत्र मिळाले तसेच उर्दू भाषा प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाविषयी असलेला अभिमान जागृत करण्यास सार्थक ठरते, असे सांगितले. डॉ. मिर्झा अख्तर बेग यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पत्रातून पत्रकारितेच्या संदर्भाने उर्दू भाषेद्वारे राष्ट्रीय एकात्मता कशी वाढवता येईल, याबाबत माहिती दिली. डॉ. काझी नाविद यांनी वली दखनी, सिराज औरंगाबादी तसेच उर्दू लेखक व कवी यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. प्राचार्य डॉ. मझहर अहमद फारुकी यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. रेहाना बेगम यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सोहेल झकीउद्दीन यांनी आभार मानले.