शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

रेशनिंग पारदर्शकता २८ दुकानांपुरतीच

By admin | Updated: November 25, 2014 01:00 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद रेशन दुकानांवरील अन्नधान्याचा आणि साखरेचा काळाबाजार थांबवून त्यात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दीड वर्षापूर्वी गाजावाजा करून

सुनील कच्छवे , औरंगाबादरेशन दुकानांवरील अन्नधान्याचा आणि साखरेचा काळाबाजार थांबवून त्यात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दीड वर्षापूर्वी गाजावाजा करून बायोमेट्रिक पद्धत आणली. मात्र, आतापर्यंत फक्त २८ दुकानांवरच ही पद्धत लागू होऊ शकली आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानांच्या तुलनेत ही संख्या दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सर्व रेशन दुकानांवर बायोमेट्रिक पद्धत लागू करण्याची घोषणा घोषणाच ठरली आहे.औरंगाबाद जिल्ह्यात १७१७ स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानांवरून दरमहा लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ, साखर तसेच केरोसीन दिले जाते. मात्र, बऱ्याच वेळा संपूर्ण कोटा उचलूनही अनेक रेशन दुकानदार लाभार्थ्यांना त्याचे वाटप करीत नाहीत आणि त्यानंतर तो कोटा बाजारभावाने विक्री करतात. त्यामुळे काळाबाजार थांबवून खऱ्या लाभार्थ्यांना अन्नधान्य आणि साखर व केरोसीन मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने दीड वर्षापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक पद्धत आणली. सुरुवातीला शहरातील ९ दुकानांवर ही पद्धत लागू केली गेली. या नऊ दुकानचालकांवर प्रत्येकी एक बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आले, तसेच दुकानचालकांना टॅब्लेटचे वाटप केले. या टॅब्लेटमध्ये लाभार्थ्यांची सर्व माहिती, त्यांचे छायाचित्र आणि बोटांचे ठसे साठविले गेले. लाभार्थी दुकानावर आल्यानंतर आधी बायोमेट्रिक मशीनवर त्याच्या बोटाचे ठसे जुळवून मगच त्याला अन्नधान्य देण्याची तरतूद यात आहे. दुकानावरील टॅब्लेट आॅनलाईन पद्धतीने मुंबई येथील सर्व्हरला जोडण्यात आलेले आहे. त्यामुळे दिवसभरात किती लाभार्थ्यांनी धान्य नेले, कोणत्या लाभार्थ्यांनी नेले याचे रेकॉर्ड दरमिनिटाला अद्ययावत होते. परिणामी, उरलेले धान्य परत करण्याशिवाय दुकानदाराला पर्याय नाही. या पद्धतीने शहरातील नऊही दुकानांवर कधी नव्हे ते दर महिन्याला काही धान्य आणि केरोसीन शिल्लक राहिल्याचे सुरुवातीलाच आढळून आले. त्यानंतर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी ग्रामीण भागातील आणखी काही दुकानांवर ही पद्धत लागू केली. तसेच हळूहळू जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांवर बायोमेट्रिक पद्धत लागू केली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, आता दीड वर्ष उलटले तरी ही पद्धत २८ दुकानांपुरतीच मर्यादित राहिली आहे. जिल्ह्यातील अजूनही १६८९ दुकानांवर जुन्याच पद्धतीने धान्य वाटप सुरू आहे. ४जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले, सध्या २८ दुकानांवर बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील उर्वरित दुकानांवरही ही पद्धत लागू करायची आहे. ४सध्या प्रत्येक दुकानावर एक बायोमेट्रिक मशीन आणि एक टॅब्लेट दिलेले आहे. हे दोन्ही एकमेकांना जोडावे लागतात. मात्र, लवकरच टॅब्लेटमध्येच बायोमेट्रिक असलेले मशीन येणार आहे. हे मशीन आले की सर्वत्र त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.