शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

रायुकाँचे दीड तास रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: December 18, 2014 00:35 IST

जालना : दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख व अन्य ४२ मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी अंबड चौफुली येथे तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

जालना : दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख व अन्य ४२ मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी अंबड चौफुली येथे तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक करून नंतर जामिनावर त्यांची मुक्तता केली.दुष्काळग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांचे शेती पंपाचे व घरगुती वीजबील शंभर टक्के माफ करावे, पुढील सहा महिने वीज बिल वसुली थांबवावी, फळबागा वाचविण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश होता. प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे अंबड चौफुली दरम्यान चारही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात रायुकाँचे जिल्हाध्यक्ष पंकज बोराडे, जयमंगल जाधव, राकाँचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, बाळासाहेब वाकुळणीकर, अ‍ॅड. संजय काळबांडे, रमेश पैठणे, राजेश राऊत, संजय दाड, नूरखान, ठाकूर, वर्षा चंद, नंदू जांगडे, सुरेश खंडाळे, बाळासाहेब तनपुरे, विश्वंभर भुतेकर, जयंत भोसले, मिर्झा अन्वर बेग, जयाजी देशमुख, शिवाजी मस्के, कल्याण सपाटे, पांडुरंग जऱ्हाड, नंदकुमार अवकाळे, नंदकुमार गिरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कदीम जालना पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)४याबाबत पत्रकारांशी बोलताना रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले की, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागासाठी ७ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केलेली असली तरी प्रत्यक्षात २ हजार कोटींचीच तरतूद केली आहे. त्यामुळे मोठ्या रक्कमेचा गाजावाजा करीत सरकार जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. ४उत्तर महाराष्ट्रात गारपीट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे हे तातडीने तेथे भेट देण्यास गेले. मात्र मराठवाड्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. जालन्यात रायुकाँने आंदोलन केल्यानंतर आंदोलनस्थळी महसूल विभागाच्या एकाही अधिकारी, कर्मचाऱ्याने निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रतिसाद दिला नाही, असा आरोपही पाटील यांनी केला. यावेळी राकाँचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, बाळासाहेब वाकुळणीकर, अ‍ॅड. पंकज बोराडे, अ‍ॅड. संजय काळबांडे, रमेश पैठणे आदी उपस्थित होते.