शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पाऊस

By admin | Updated: June 6, 2014 01:04 IST

लातूर : अहमदपूर तालुक्यातील धानोरा आणि चाकूर तालुक्यातील म्हाळंगी या गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला़

लातूर : अहमदपूर तालुक्यातील धानोरा आणि चाकूर तालुक्यातील म्हाळंगी या गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला़ जोरदार वादळी वार्‍यामुळे धानोरा येथील ५० घरांवरील पत्रे उडाले़ म्हाळंगीत विद्युत तारा तुटल्याने गाव अंधारात राहिले़बुधवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उष्णता कमी जाणवत होती़ परंतु, गुरुवारी पुन्हा वातावरणात बदल होऊन उन्हाची तीव्रता आणखीन वाढली़ त्यामुळे दिवसभर नागरिक घामाघूम झाल्याचे जाणवत होते़ गुरुवारी सायंकाळी ५़३० च्या सुमारास अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथे ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार वादळी वार्‍यास सुरुवात झाली़ दरम्यान, विजांच्या कडकडाटात अर्धा तास पाऊस पडला़ वादळी वार्‍यामुळे गावातील जवळपास ५० घरांवरील पत्रे उडून हवेत तरंगत होते़ सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही़ वादळी वार्‍यामुळे धनराज साखरे, संतोष साखरे यांच्यासह अन्य काही शेतकर्‍यांच्या शेतातील फळझाडे कोसळली़ काही शेतकर्‍यांच्या ऊस आडवा झाला़ शिवाजी कनेरे यांच्या शेतातील डाळींबाच्या बागेचे नुकसान झाले़ वादळी वार्‍यासह जवळपास अर्धा तास पाऊस झाला़चाकूर तालुक्यातील म्हाळंगी येथेही सायं़ ५़३० च्या सुमारास दहा मिनीटे वादळी वार्‍यासह पाऊस झाला़ वादळी वार्‍यामुळे विद्युत तारा तुटल्या़ परिणामी गावात अंधार निर्माण झाला़ तसेच काही झाडेही कोसळली असल्याचे सांगण्यात आले़बुधवारी दुपारी २ ते २़३० च्या सुमारास औसा तालुक्यातील बहुतांश भागात वादळी वार्‍यासह पाऊस झाला़ त्यामुळे नागरसोगा , जवळगा (पो), वानवडा व जुना औसा हे चार ३३ के ़व्ही़ उपकेंद्र रात्रभर अंधारात राहिल़ परिणामी या उपकेंद्रातंर्गातील २० ते २२ गावांतील नागरिक घामाघूम झाले़ खंडित वीज पुरवठा गुरूवारी दुपारी सुरळीत झाला़ बुधवारी दुपारी ३३ के ़व्ही च्या ४ उपकेंद्रामध्ये जाणार्‍या वीजवाहिनीमध्ये बिघाड झाला़ बुधवारी रात्री १० वा़पर्यंत महावितरणच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी प्रयत्न करूनही बिघाड सापडला नाही़ त्यामुळे या उपकेंद्रातंर्गतची नागरसोगा, दापेगाव, जवळगा (पो) , दावतपूर, फत्तेपूर, संक्राळ, वानवडा, तुंगी यासह २० गावातील नागरिकांना अंधारात घामाघूम होऊन रात्र काढावी लागली़ या संदर्भात राज्य वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एम़ एऩ घाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, बुधवारी झालेल्या पावसात वीजवाहिनीत बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता़ गुरूवारी दुपारी १२ वाजता या चारही उपकेंद्रातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे़किल्लारी व परिसरात बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने जवळपास ५५ विद्युत पोल कोसळले़ तसेच अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली़ वादळी वार्‍यामुळे किल्लारी, किल्लारी भाग- २, तळणी फिडर, कार्ला, नदी हत्तरगा, जूने किल्लारी गाव, मोगरगा आदी गावांतील ५५ विद्युत पोल कोसळले़ (प्रतिनिधी)