शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

पाऊस आला पण हंगाम गेला

By admin | Updated: August 25, 2014 23:55 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड मागील अडीच ते तीन महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने नुकतीच जिल्ह्यात सुरूवात केली असली तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडमागील अडीच ते तीन महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने नुकतीच जिल्ह्यात सुरूवात केली असली तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. सोमवारपर्यंत जिल्हयात सरासरीच्या तुलनेत ४८.०३ टक्के एवढ्या पावसाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आहे.जिल्हयात १३० टक्के खरीपाची पेरणी जुलै दरम्यान झालेली आहे. मधल्या दोन महिन्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने जिल्हयातील खरीप पिके मोठ्या प्रमाणात करपून गेले आहेत. जिल्हयात ४ लाख हेक्टरवर कापूस, दीड लाख हेक्टर सोयाबीन तर ९० हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी झालेली असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. मोजक्याच शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते. परंतु बहुतांश शेतकऱ्यांची पिके पावसाअभावी करपून गेली आहेत. आज ना उद्या पाऊस पडेल या भाबड्या आशेवर अवलंबून असलेल्या बळीराजाचे पिक पावसा अभावी जळून खाक झालेले आहे. ही जिल्हयातील वस्तू स्थिती आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रातील पन्नास टक्के पिकांना सुरू असलेल्या पावसाचा फारसा फरक पडेल असे चित्र जिल्हयात नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. मागील चार दिवसात जिल्हयात पावसाने सुरूवात केली मात्र अडीच महिने पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरलेले धान्य उगवलेच नाही. अशी परिस्थिती जिल्हयात बहुतांश ठिकाणी निर्माण झाली असल्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितले.