शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

पावसाने पुन्हा डोळे वटारले

By admin | Updated: August 22, 2015 23:58 IST

उस्मानाबाद : मागील आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबाद : मागील आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने चिंता वाढल्याचे दिसून येत आहे. बुधवारी उस्मानाबादसह लोहारा, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. हा पाऊस सक्रीय होवून चारा-पाण्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र मागील दोन दिवस जिल्ह्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण असतानाही पाऊस न झाल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस झालेला नव्हता. उमरगा, लोहारा आणि कळंब परिसरात शुक्रवारी हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी या परिसरातील नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शुक्रवारी उस्मानाबाद तालुक्यात अवघा ०.५० मिमी, उमरगा तालुक्यात १.४० मिमी, लोहाऱ्यात १ मिमी तर कळंब तालुक्यात १.३३ मिमी पावसाची नोंद झाली. उर्वरित तालुके कोरडे राहिले. दरम्यान, आॅगस्ट महिना संपत आला तरी जिल्हाभरात अत्यल्प पाऊस झालेला असल्याने पाणीसाठे वेगाने खालावत आहेत. पर्यायाने शहरांबरोबरच ग्रामीण भागातही पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर स्वरुप धारण करीत असल्याचे चित्र आहे. मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. यंदा तर सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नसल्याने उपलब्ध पाण्याचा नागरिकांनी जपून वापर करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)