शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

पावसाने पुन्हा डोळे वटारले

By admin | Updated: August 22, 2015 23:58 IST

उस्मानाबाद : मागील आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबाद : मागील आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने चिंता वाढल्याचे दिसून येत आहे. बुधवारी उस्मानाबादसह लोहारा, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. हा पाऊस सक्रीय होवून चारा-पाण्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र मागील दोन दिवस जिल्ह्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण असतानाही पाऊस न झाल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस झालेला नव्हता. उमरगा, लोहारा आणि कळंब परिसरात शुक्रवारी हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी या परिसरातील नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शुक्रवारी उस्मानाबाद तालुक्यात अवघा ०.५० मिमी, उमरगा तालुक्यात १.४० मिमी, लोहाऱ्यात १ मिमी तर कळंब तालुक्यात १.३३ मिमी पावसाची नोंद झाली. उर्वरित तालुके कोरडे राहिले. दरम्यान, आॅगस्ट महिना संपत आला तरी जिल्हाभरात अत्यल्प पाऊस झालेला असल्याने पाणीसाठे वेगाने खालावत आहेत. पर्यायाने शहरांबरोबरच ग्रामीण भागातही पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर स्वरुप धारण करीत असल्याचे चित्र आहे. मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. यंदा तर सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नसल्याने उपलब्ध पाण्याचा नागरिकांनी जपून वापर करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)