शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

अवकाळीचा रबीला फटका

By admin | Updated: March 2, 2015 00:51 IST

जालना : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर अवकाळी पावसामुळे रबी पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जालना : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर अवकाळी पावसामुळे रबी पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पावसाळी वातावरणामुळे सर्दी, खोकला यासारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. शनिवारी सकाळपासूनच वातावरणात बदल झाला. रिमझिम पाऊस व हवेतील गारवा अधिक वाढल्याने असंख्य नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी रेनकोट किंवा उबदार कपड्यांचा वापर करणेच पसंत केले. रविवारी पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे सखल भागात पाणी साचून रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना त्याचा त्रास होत होता. जिल्ह्यात प्रामुख्याने आंबा, द्राक्ष, डाळिंब यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी काढायला आलेली आहे. परंतु पावसामुळे ती काळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. गहू, हरभरा या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोंगणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सलग दोन दिवस पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जालना तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पून्हा अडचणीत सापडला आहे. अनेक गावांमध्ये शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. रविवारी दिवसभर अधून-मधून रिमझिम पाऊस सुरूच होता. परिसरातील शेतकऱ्यांनी गहु, ज्वार, हरभरा पिकांचे सोंगणी करून ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान टळले. मात्र अनेक शेतकऱ्यांचे रबी पिके अजून शेतातच उभी आहेत. परतूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. २८ रोजी रात्री सात वाजता पावसास सुरूवात झाली या पावसात गारा व जोराच्या वाऱ्याचा समावेश नसल्याने उभ्या पिकाचे नुकसान झाले नाही. मात्र काढणीस आलेले व व काढून पडलेले गहू व ज्वारी यांचे मात्र नुकसान झाले आहे. या पावसादरम्यान विजेचा लपंडाव सुरूच होता. शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने सरकारी कार्यालये बंद होती. शनिवारी शाळांमध्येही विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. भोकरदन तालुक्यात गहू, हरभरा, मका, कांदा सीडचे मोठे नुकसान झाले आहे. सिपोरा बाजार येथील आठवडी बाजारालाही पावसाचा फटका बसला आहे.