शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

मराठा, लिंगायत आरक्षणाचा प्रश्न काँग्रेस सरकारनेच मार्गी लावला - अशोकराव चव्हाण

By admin | Updated: October 14, 2014 00:11 IST

शरद वाघमारे, मालेगाव काँग्रेस सरकारनेच मराठा आरक्षण व लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला़ आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही केंद्राकडे पाठपुरावा केला व यापुढेही करु,

शरद वाघमारे, मालेगावकाँग्रेस सरकारनेच मराठा आरक्षण व लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला़ आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही केंद्राकडे पाठपुरावा केला आहे व यापुढेही करु, असे माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी मालेगाव येथे रविवारी रात्री झालेल्या सभेत सांगितले़खा़ चव्हाण म्हणाले, दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांनी हरित व सिंचनक्रांती करुन जिल्ह्याची पायभरणी केली आहे़ त्यांनी विकास कामाचा पाया रचला आता आपल्या साथीने कळस चढविण्याचे काम करायचे आहे़ त्यासाठी भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यातून अमिता चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या़ या जिल्ह्याने लोकसभेमध्ये महाराष्ट्राची शान राखली आहे़ पक्षाने यापूर्वी ज्यांना मोठी पदे दिली तेच हव्यासापोटी दलबदलू झाले आहेत़ माझ्या पत्नीला मिळालेली उमेदवारी केवळ तुमच्या आग्रहावरुन दिलेली आहे, असेही ते म्हणाले़जिल्हाध्यक्ष बी़ आऱ कदम, माजी जि़ प़ अध्यक्ष माणिकराव इंगोले, तालुकाध्यक्ष केशवराव इंगोले, पिंटू स्वामी, सरपंच मंगला स्वामी आदींची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन शंकर कंगारे यांनी केले़ भोकर: ग्रामीण भागातील समस्या मी जवळून पाहिल्या आहेत़ ज्या ठिकाणी गरज आहे़ तेथील विकास करीत हा मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी मी नेहमीच बांधील आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़भोकर तालुक्यातील बटाळा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी ते बोलत होते़ ते म्हणाले, या मातीचे व आमचे जुने नाते आहे़ हे मी कदापि विसणार नाही़ येथे नंदनवन फुलवण्यासाठी सिंचनाची मोठ्या प्रमाणात कामे करु़ मी तुमचा खासदार म्हणून पाच वर्षे आहे़ माझ्या सोबतीला आमदार असला की, विकासाचा मार्ग सुकर होणार आहे़ यासाठी अमिता चव्हाण यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले़ यावेळी अप्पाराव देशमुख सोमठाणकर, राजा खंडेराव देशमुख, जगदिश भोसीकर, मंगाराणी अंबुलगेकर, गोविंद गौड, सिद्धेश्वर पिटलेवाड, गंगाधर बटाळकर यांची उपस्थिती होती़ दरम्यान, अमिता चव्हाण यांनी आज दिवशीतांडा, पाकीतांडा, सावरगावतांडा, वागर, पांढरवाडी या ठिकाणी बैठका घेतल्या़ विकासाबाबत आपली भूमिका विशद करताना अमिता चव्हाण म्हणाल्या, मागील पाच वर्षांपूर्वी वाडी तांड्यावर रस्ते नव्हते; पण आता या रस्त्याचे मजबुतीकरण झाले आहे़ या भागाच्या विकासासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे़ विकासाला गती देण्याची गरज आहे़ यासाठी खा़ अशोकराव चव्हाण, मी व आपण सर्वांनी मिळून काम करु़ यावेळी मंगला निमकर, कैलास राठोड, राजू पाटील दिवशीकर, माधव राठोड, इराबाई राठोड, कैलास कदम, गंगाधर राठोड, राजू हनवते, गजानन ढगे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)