शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मराठा, लिंगायत आरक्षणाचा प्रश्न काँग्रेस सरकारनेच मार्गी लावला - अशोकराव चव्हाण

By admin | Updated: October 14, 2014 00:11 IST

शरद वाघमारे, मालेगाव काँग्रेस सरकारनेच मराठा आरक्षण व लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला़ आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही केंद्राकडे पाठपुरावा केला व यापुढेही करु,

शरद वाघमारे, मालेगावकाँग्रेस सरकारनेच मराठा आरक्षण व लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला़ आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही केंद्राकडे पाठपुरावा केला आहे व यापुढेही करु, असे माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी मालेगाव येथे रविवारी रात्री झालेल्या सभेत सांगितले़खा़ चव्हाण म्हणाले, दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांनी हरित व सिंचनक्रांती करुन जिल्ह्याची पायभरणी केली आहे़ त्यांनी विकास कामाचा पाया रचला आता आपल्या साथीने कळस चढविण्याचे काम करायचे आहे़ त्यासाठी भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यातून अमिता चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या़ या जिल्ह्याने लोकसभेमध्ये महाराष्ट्राची शान राखली आहे़ पक्षाने यापूर्वी ज्यांना मोठी पदे दिली तेच हव्यासापोटी दलबदलू झाले आहेत़ माझ्या पत्नीला मिळालेली उमेदवारी केवळ तुमच्या आग्रहावरुन दिलेली आहे, असेही ते म्हणाले़जिल्हाध्यक्ष बी़ आऱ कदम, माजी जि़ प़ अध्यक्ष माणिकराव इंगोले, तालुकाध्यक्ष केशवराव इंगोले, पिंटू स्वामी, सरपंच मंगला स्वामी आदींची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन शंकर कंगारे यांनी केले़ भोकर: ग्रामीण भागातील समस्या मी जवळून पाहिल्या आहेत़ ज्या ठिकाणी गरज आहे़ तेथील विकास करीत हा मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी मी नेहमीच बांधील आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़भोकर तालुक्यातील बटाळा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी ते बोलत होते़ ते म्हणाले, या मातीचे व आमचे जुने नाते आहे़ हे मी कदापि विसणार नाही़ येथे नंदनवन फुलवण्यासाठी सिंचनाची मोठ्या प्रमाणात कामे करु़ मी तुमचा खासदार म्हणून पाच वर्षे आहे़ माझ्या सोबतीला आमदार असला की, विकासाचा मार्ग सुकर होणार आहे़ यासाठी अमिता चव्हाण यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले़ यावेळी अप्पाराव देशमुख सोमठाणकर, राजा खंडेराव देशमुख, जगदिश भोसीकर, मंगाराणी अंबुलगेकर, गोविंद गौड, सिद्धेश्वर पिटलेवाड, गंगाधर बटाळकर यांची उपस्थिती होती़ दरम्यान, अमिता चव्हाण यांनी आज दिवशीतांडा, पाकीतांडा, सावरगावतांडा, वागर, पांढरवाडी या ठिकाणी बैठका घेतल्या़ विकासाबाबत आपली भूमिका विशद करताना अमिता चव्हाण म्हणाल्या, मागील पाच वर्षांपूर्वी वाडी तांड्यावर रस्ते नव्हते; पण आता या रस्त्याचे मजबुतीकरण झाले आहे़ या भागाच्या विकासासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे़ विकासाला गती देण्याची गरज आहे़ यासाठी खा़ अशोकराव चव्हाण, मी व आपण सर्वांनी मिळून काम करु़ यावेळी मंगला निमकर, कैलास राठोड, राजू पाटील दिवशीकर, माधव राठोड, इराबाई राठोड, कैलास कदम, गंगाधर राठोड, राजू हनवते, गजानन ढगे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)