शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

स्वच्छतेचा प्रश्न कायमच

By admin | Updated: January 11, 2015 00:55 IST

जालना : शहर स्वच्छतेच्या कामासाठी काही महिन्यांपूर्वी नियुक्त केलेल्या एजन्सीने अवघ्या दोन महिन्यातच काढता पाय घेतल्यानंतर नगरपालिकेने पुन्हा एक एजन्सी नियुक्त केली आहे.

जालना : शहर स्वच्छतेच्या कामासाठी काही महिन्यांपूर्वी नियुक्त केलेल्या एजन्सीने अवघ्या दोन महिन्यातच काढता पाय घेतल्यानंतर नगरपालिकेने पुन्हा एक एजन्सी नियुक्त केली आहे. मात्र पालिकेचा वाहन खरेदीचा प्रस्ताव धूळ खात पडून असून त्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सुमारे तीन लाख लोकसंख्येच्या या शहरात स्वच्छतेसाठी सफाई कामगारांची संख्या जी होती, तीच आहे. ३५७ कामगारांपैकी ३५० कार्यरत आहेत. त्यामध्ये सुमारे शंभर कामगारांची नियुक्ती ही काही वरिष्ठ तसेच पालिका अधिकाऱ्यांच्या निवासस्थानीच ड्यूटी आहे. याशिवाय उर्वरीत २५० कामगारांकडून शहराची स्वच्छता करण्यात येते. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे सर्व भागात ही स्वच्छता होत नाही, हे स्पष्ट आहे. १४ प्रभागांमध्ये कचऱ्यांचे अड्डे मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथे साचणारा कचरा नियमित वाहून नेला जात नाही. परिणामी अनेक भागात दुर्गंधी सुटते. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न नेहमीच कायम राहतो. शहराच्या अनेक भागात कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या नाहीत.विशेषत: कॉलनी वसाहती व झोपडपट्टी भागांमध्ये रस्त्याच्या बाजूलाच कचऱ्याचे उकंडे तयार झाल्याचे चित्र दिसून येते. अशा ठिकाणी सफाई होत नसल्याने तेथील नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागते. हा प्रकार अनेक भागांमध्ये होतो. गेल्या काही दिवसांपासून प्रमुख रस्त्यांवरील कचरा वाहून नेण्यात येत असला तरी काही अंतर्गत भागात मात्र कचऱ्याचे ढिगारे कायम असतात. डासांचा उपद्रव निर्माण होतो. त्यामुळे साथरोगांची शक्यताही नाकारता येत नाही. या बाबीकडे नगर पालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे व उपनगराध्यक्ष शाह आलम यांनी सफाईच्या कामांना प्रत्यक्ष भेटी दिल्याने मागील काही महिन्यांपासून सफाईच्या कामावर कामगार मोठ्या प्रमाणात नियमित हजर राहू लागले. परंतु तरीदेखील अडचण होऊ लागल्याने मध्यंतरी नगरपालिका प्रशासनाने कार्यरत सफाई कामगारांना जुना जालना विभागातील कामे देऊन नवीन जालना विभागासाठी पुणे येथील स्वच्छता एजन्सी नियुक्त केली होती. परंतु या एजन्सीला फार काळ टिकता आले नाही. तेथील नागरिकांकडूनही पालिका प्रशासनाकडे तक्रारी गेल्याने या एजन्सीने काढता पाय घेतला. जालना नगरपालिकेने सन २००० मध्ये घनकचरा प्रकल्प सामनगाव येथे निश्चित केला. मात्र पहिल्या टप्प्यात ७० लाखांची जी कामे झाली, त्या कामांना प्रशासकीय मान्यता नसल्याच्या कारणावरून या प्रकल्पास पुढे शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. ही प्रशासकीय मान्यता कोणी द्यायची, असा पेच निर्माण झाला. विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकारी कार्यालय तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे बोट दाखविले जाते. या टोलवाटोलवीमध्ये घनकचरा प्रकल्पाचा प्रश्न कायम असल्याचे काही जाणकार सदस्यांनी सांगितले.