शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

बंधार्‍यांचा प्रश्न मार्गी लागणार

By admin | Updated: May 29, 2014 00:40 IST

जालना : शिरपूर पद्धतीचे आठ बंधारे जालना शहरात बांधण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यतेनंतर लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जालना : शिरपूर पद्धतीचे आठ बंधारे जालना शहरात बांधण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यतेनंतर लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिरपूर पॅटर्नचे जनक जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनानुसार घाणेवाडी ते जालना दरम्यान कुंडलिका नदीवर यापूर्वीच दोन बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आलेले आहेत. त्याचा परिणाम भूजल पातळी वाढण्यात झाला असून परिसरातील शेतकर्‍यांना, ग्रामस्थांना त्याचा फायदा होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गतवर्षी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जालना दौर्‍यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शिरपूर पॅटर्नचे बंधारे बांधण्यासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आठ बंधार्‍यांसाठी आठ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. कुंडलिका नदीवर नऊ कि़मी. अंतरावर हे बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी जलतज्ज्ञ खानापूरकर यांनी सर्व्हे करून ठिकाणेही निश्चित केलेली आहेत. आता या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार यावर निर्णय घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, स्थानिक स्तर लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सत्तारखान, कृषी अधीक्षक उमेश घाटगे, उपअभियंता कांबळे यांच्यासह संबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. या बैठकीतून या बंधार्‍यांच्या अनुषंगाने अधिकार्‍यांनी आराखड्याची माहिती सादर केली. तसेच, बंधार्‍यांच्या अंदाजपत्रकासह उपयुक्ततेसंदर्भातही सविस्तर तपशील सादर केला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी रखडलेल्या या कामासंदर्भात विचारणा केली. या बंधार्‍यांची कामे जलदगतीने पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीतून बंधार्‍याच्या अनुषंगाने तांत्रिक गोष्टींवरही चर्चा करण्यात आली. हे बंधारे अधिकाधिक शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ठरावेत, तसेच ठिकठिकाणी बंधार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी अडवून जमिनीतील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ व्हावी, असा सूर व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने या बंधार्‍यांसाठी सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून ८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतूदीचा विनियोग अधिकाधिक काटेकोरपणे व्हावा, तसेच बंधार्‍यांच्या कामात पारदर्शकता असावी, असाही सूर या बैठकीतून व्यक्त करण्यात आला. यावेळी बंधार्‍यांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. शिरपूर पद्धतीचे बंधारे हे ६० मीटर रूंद व तीन मीटर खोली राहणार आहे. त्यामुळे परिसरातील विहिरी तसेच हातपंपाची पाणीपातळी वाढण्यास मदत होऊन पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करता येणे शक्य आहे. (प्रतिनिधी) सरकारी पातळीवर अनेक अडथळे या बंधार्‍यासाठीचा निधी प्राप्त झाल्यानंतर या जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी समन्यायी पद्धतीने तो निधी संपूर्ण जिल्ह्यात बंधारे उभारण्यासाठी खर्च व्हावा, यासाठी मोठा आटापिटा केला होता. परंतु, लोकप्रतिनिधीचे हे हेतूत: प्रयत्न उधळून टाकण्यात आले. कठोर भूमिकेमुळे अनेक अडथळे झाले दूर कुंडलिका नदीवरील हे आठ बंधारे उभारण्यासंदर्भात सरकारी पातळीवरून अनेक अडचणी उभ्या करण्यात आल्या. विशेषत: काही ‘झारीतल्या शुक्राचार्यांनी’ त्यासाठी विशेष प्रयत्न केले. परंतु, जलतज्ज्ञ खानापूरकर यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतल्यानंतर अनेक अडथळे दूर झाले.