शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
4
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
5
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
6
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
7
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
8
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
9
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
10
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
11
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
12
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
13
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
14
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
15
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
16
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
17
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
18
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
19
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
20
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

३४ चारा छावण्यांचे प्रस्ताव !

By admin | Updated: August 22, 2015 23:58 IST

उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने सरासरीच्या अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. यंदा तर अत्यंत गंभीर चित्र निर्माण झाले आहे.

उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने सरासरीच्या अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. यंदा तर अत्यंत गंभीर चित्र निर्माण झाले आहे. आॅगस्ट महिना सरत आला असताना एकही दमदार पाऊस झाला नसल्याने पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. सदरील प्रश्न लक्षात घेवून शासनाने चारा छावण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मागील दोन-तीन दिवसांत अकरा संस्थांनी मिळून छावण्या सुरू करण्यासाठी ३४ प्रस्ताव दाखल केले आहेत. ही संख्या आणखी वाढू शकते. १९ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यातील पशुधनाची संख्या ७ लाख ३७ हजार ३४७ आहे. यामध्ये ४ लाख १२ हजार १४ एवढी मोठी जनावरे आहेत. शेळ्या, मेंढ्यांची संख्या २ लाख ११ हजार ५४२ तर लहान जनावरे १ लाख १३ हजार ७९१ एवढी आहेत. मागील तीन वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या अत्यल्प पावसामुळे सध्या उपरोक्त पशुधन अडचणीत सापडले आहे. अवेळी पडलेल्या पावसामुळे व गारपीटीने रबीच्या पिकांना फटका बसला. त्यामुळे कडबा अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होवू शकला नाही. असे असतानाच किमान खरीप हंगामात तरी चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र प्रत्यक्षात यंदा ही पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेला चाराही आता संपला आहे. दुसरीकडे जनावरे विक्रीसाठी नेली असता, त्यांना चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे अशा टंचाईच्या काळात जनावरे सांभाळायची कशी? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. एकंदरितच दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हाभरातील सुमारे सव्वासात लाखावर पशुधन अडचणीत आले आहे. कडब्याच्या एका पेंडीसाठी किमान २५ ते ३० रूपये मोजावे लागत आहेत. एवढे पैसे मोजूनही कडबा मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान, भूम तालुक्यामध्ये चाऱ्यासोबतच पाण्याचा प्रश्नही अत्यंत कठीण बनला आहे. त्यामुळेच की काय, एकट्या भूम तालुक्यातून चोवीस छावण्या सुरू करण्यासाठीचे अर्ज आले आहेत. तसेच कळंब दोन, उस्मानाबाद सात, लोहारा एक आणि तुळजापूर तालुक्यातून ३ अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संबंधित संस्थांनी तातडीने सविस्तर प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)