शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मालमत्ताकर वसुली, कचरा संकलनाचे खाजगीकरण

By admin | Updated: July 4, 2014 01:11 IST

औरंगाबाद : मनपातील सत्ताधाऱ्यांमधील काही पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात शहरातील कचरा संकलन आणि मालमत्ताकर वसुलीचे खाजगीकरण करण्याचा विचार घोळू लागला आहे.

औरंगाबाद : मनपातील सत्ताधाऱ्यांमधील काही पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात शहरातील कचरा संकलन आणि मालमत्ताकर वसुलीचे खाजगीकरण करण्याचा विचार घोळू लागला आहे. मनपाचे उत्पन्न वाढविण्याच्या नावाखाली तो व्यावसायिक विचार पुन्हा पुढे येण्याची शक्यताआहे. पुढच्या स्थायी समितीच्या बैठकीत तसा प्रस्ताव येईल, असे चित्र आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कचरा आणि मालमत्ताकर वसुलीचा तांत्रिक आढावा घेण्यात शिवसेनेचे सदस्य आघाडीवर असल्याचे दिसले. अनेकांनी खाजगीकरणातून कचरा संकलन व मालमत्ताकर वसुली करण्यात यावी, असेही सुचविले. सदस्य सुरेंद्र कुलकर्णी, त्र्यंबक तुपे यांच्या मतांवर सभापती विजय वाघचौरे म्हणाले, मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावेच लागतील. मनपाने शहरातील ४५० टन कचरा संकलनासाठी नागरिकांवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त बोजा टाकण्याचा निर्णय २०१३ मध्ये घेतला होता. त्याला भाजपा पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. भाजपाचे दिवंगत नेते खा.गोपीनाथ मुंडे यांनी महापौर निवासस्थानी बैठक घेतली होती. त्या बैठकीत त्यांनी कचरा संकलनाचे खाजगीकरण रद्द करण्याचे सूचित केले होते. शिवसेनेच्या एककलमी धोरणांना भाजपाने एकप्रकारे चाप लावल्यामुळे कचऱ्याचे खाजगीकरण लांबले. आता तो प्रस्ताव पुन्हा आणला जाणार आहे. कचरा संकलनावरील खर्च कचरा संकलनाचे खाजगीकरण सध्या शक्य नव्हते. वर्षाला ५० कोटी रुपये कचऱ्याच्या संकलन, वाहतुकीवर खर्च होत आहेत. प्रशासनाचे मत असे-कर वसुली अधिकारी शिवाजी झनझन म्हणाले, तीन महिन्यांत ८ कोटींचा मालमत्ताकर वसूल झाला आहे. ११ कोटींची जुनी थकबाकी आहे. यावर्षी १०० कोटींचे उद्दिष्ट आहे. मालमत्ताकर वसुलीचा प्रस्ताव पुन्हा...२२ मार्च २०१३ रोजी शासनाने पालिकेच्या मालमत्ताकर वसुलीचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाला जोरदार हबाडा दिला. तोच प्रस्ताव पुन्हा मंजूर करून शासनाकडे पाठविण्याच्या हालचाली सुरू आहेत.सहकार एजन्सीसह कोणार्क इन्फ्रा स्ट्रक्चर, शिवराज असोसिएटस् व अन्य दोन संस्थांनी शहरातील १ लाख ८७ हजार मालमत्तांच्या कर वसुलीत रस दाखविला होता. खाजगीकरणाचा निर्णय शासन मान्यतेच्या अधीन राहून झाला होता.शासनाचे तोंडी आदेश असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला होता. सभेने मंजूर केलेला प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे मान्यतेसाठी सप्टेंबर २०१२ मध्ये पाठविला़ नागरिकांना खाजगी गुत्तेदाराकडून त्रास होईल़ या हेतूमुळे त्या प्रस्तावास शासनाने मान्यता देण्याचे टाळले़ त्यामुळे शासनाने पालिकेला कोणताही अभिप्राय दिला नाही़