शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

५७ कोटींचा पीकविमा मंजूर

By admin | Updated: November 28, 2014 01:11 IST

बाळासाहेब जाधव , लातूर केंद्र व राज्य सरकारच्या वतीने हवामानावर आधारीत पीकविमा योजना या वर्षात नव्याने सुरु केली आहे.

बाळासाहेब जाधव , लातूरकेंद्र व राज्य सरकारच्या वतीने हवामानावर आधारीत पीकविमा योजना या वर्षात नव्याने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत ३ लाख ९७ हजार ४५९ शेतकऱ्यांनी २,१३,४१२ हेक्टर क्षेत्रासाठी १७ कोटी ७४ लाख २८ हजार २५२ रुपये शेतकऱ्याने भरले होते़ त्यावर ५६ कोटी ९३ लाख ४ हजार ३१२ रुपये लातूरसाठी मंजूर झाले आहेत.केंद्र व राज्याच्या संयुक्त विद्यमाने हवामानावर आधारित पीकविम्यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारी, मुग, उडीद या चार पिकांवर आधारीत पीकविमा भरण्याचे नियोजन केले होते़ यामध्ये ज्वारीसाठी प्रतिहेक्टरी ७२४़५० रुपये, सोयाबीनसाठी ९१२ रुपये, मुगासाठी ७२३़७५ रुपये, उडीद या पिकासाठी ७३१़२५ रुपये या प्रमाणे प्रतिहेक्टरी विमा भरला़ यामध्ये शासनाकडून ज्वारीसाठी ७२३, सोयाबीनसाठी ८९३, मुगासाठी ७२३़७५ आणि उडीद पिकासाठी ७३१़२५ याप्रमाणात रक्कम भरणे अपेक्षीत होते़ या हवामानावर आधारीत पीकविम्यासाठी ३ लाख ९७ हजार ४५९ शेतकऱ्यांनी २ लाख १३ हजार ४१२ हेक्टरवरील पिकांसाठी १७ कोटी ७४ लाख २८ हजार २५२ रुपये पीकविम्यापोटी भरली होती़ यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ३५ कोटी २५ लाख ६९ हजार ४५४ रुपयांची रक्कम विमा कंपनीकडे भरली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यासाठी ५६ कोटी ९३ लाख ४ हजार ३१२ रुपयांचा पीकविमा मंजूर करण्यात आला आहे़ केंद्र व राज्य शासनाच्या वतीने हवामानावर आधारीत पीकविमा भरल्यानंतर ४५ दिवसांत शासनाकडून आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे सांगितले जात होते़ १५ आॅक्टोबर ही तारीख पीकविमा भरण्याची अंतीत तारीख होती़ २७ नोव्हेंबर उलटला तरी राज्य शासनाची रक्कम न भरल्याने शासनाची घोषणा फोल ठरली असल्याचे दिसून येत आहे़४लातूर जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने या वर्षी हवामानावर आधारीत पीकविमा सुरु केला होता़ यामध्ये ३,९७,४५९ शेतकऱ्यांनी २,१३,४१२ हेक्टरवरील पिकासाठी १७,७४,२८,२५२ रुपयापर्यंतची रक्कम भरली होती़ यापोटी केंद्रशासनाच्या वतीने ५६,९३,०४,३१२ रुपयाचा पीकविमा मंजूर झाला आहे़ राज्याचा पीकविमा मंजूर होताच सदरील रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे़ ४हवामानावर आधारीत पिकामध्ये सोयाबीन, ज्वारी, मुग, उडीद या चार पिकासाठी शेतकऱ्यांनी पीकविम्यापोटी ५० टक्के रक्कम भरणे अपेक्षीत होते़ तर उर्वरीत ५० टक्के रक्कम केंद्र शासन व राज्य शासनामार्फत भरण्यात येणार होते़ परंतु या रकमेत फक्त केंद्रानेच रक्कम भरल्याने ५६,९३,०४,३१२ रुपये रक्कम मंजूर झाली़ परंतु राज्य शासनाने २५ टक्के निधी न भरल्याने कंपनीकडून दोन महिन्यात वाटप होणार असल्याचे सांगितले तरी राज्य शासनाचा पीकविमा निधी भरल्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास अडचण येणार आहे़