शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

तलाव कोरडे; चिंता वाढली

By admin | Updated: August 3, 2014 01:15 IST

एम़जी़मोमीन , जळकोट तालुक्यातील १२ साठवण तलावांनी तळ गाठला आहे़ केवळ १३ टक्के पाणीसाठा आहे़ परिणामी दिवसेंदिवस पाण्याची समस्या उग्र बनत असल्याने शेतकऱ्यांसह पशूपालक धास्तावले आहेत़

एम़जी़मोमीन , जळकोटतालुक्यातील १२ साठवण तलावांनी तळ गाठला आहे़ केवळ १३ टक्के पाणीसाठा आहे़ परिणामी दिवसेंदिवस पाण्याची समस्या उग्र बनत असल्याने शेतकऱ्यांसह पशूपालक धास्तावले आहेत़तालुक्यातील ढोरसांगवी, जिरगा, कोळनूर, माळहिप्परगा, चेरा, गुप्ती, हाळद वाढवणा, कोनाळी, विराळ आदी गावांत १२ साठवण तलाव आहेत़ गेल्या वर्षी हे तलाव तुडुंब भरले होते़ यंदा मात्र तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्याने तलावातील पाणीसाठा मृत अवस्थेत आहे़गेल्या वर्षी साठवण तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली होती़ तब्बल दोन हजार हेक्टरवर ऊसाची लागवड आहे़ यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाने पाठ फिरवल्याने साठवण तलावांनी तळ गाठला आहे़ परिणामी शेतकऱ्यांचे ऊस वाळत आहे़ त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट उभारले आहे़तालुक्यातील अनेक गावांना नजीकच्या साठवण तलावांतून पाणीपुरवठा होतो़ परंतु, साठवण तलावात पाणीसाठा नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे़ आॅगस्ट महिना उजाला तरी तालुक्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे जळकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून होत आहे़ तसेच तालुक्यातील ऊस उत्पादकांचा, शेतकऱ्यांच्या खरीपाचा शासनाने तात्काळ सर्व्हे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे़ पाऊस नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे़ त्यामुळे आकाशाकडे डोळे लागले आहेत़ बालाजी थेटे ल्ल औराद शहाजानीनिम्मा पावसाळा संपला़ मात्र, या भागात अद्यापही मोठा पाऊस झाला नाही़ परिणामी पेरण्या खोळंबल्या आहेत़ तसेच तेरणा, मांजरा नद्या कोरड्या पडल्या आहेत़ त्यामुळे या नद्यांवरील आठही कोल्हापुरी बंधारे कोरडी आहेत़पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले आहेत़ परंतु, या भागात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही़ औराद परिसरात जून महिन्यात ७५ मी़मी़ तर जुलै महिन्यात ७८ मी़मी़ इतका पाऊस पडला आहे़ अल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे़ पाऊस नसल्याने उगवलेली पिके वाळून जात आहेत़ दमदार पाऊस नसल्याने अद्यापही मांजरा व तेरणा नद्या कोरड्या आहेत़ परिणामी या नद्यांवरील औराद, तगरखेडा, वांजरवाडा, तुगाव, सोनखेड, किल्लारी, मदनसुरी, मुजरगा ही कोल्हापुरी बंधारे कोरडी आहेत़ पाणीसाठाच नसल्याने पाणीपुरवठ्याच्या योजनाही बंद पडल्या आहेत़