शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

पोलिसांची सुरक्षित घर योजना बारगळली

By admin | Updated: May 15, 2014 00:27 IST

बापू सोळुंके , औरंगाबाद उन्हाळ्याच्या सुटीत विवाह समारंभ, सहल अथवा अन्य कारणास्तव नागरिक बोहरगावी जातात.

 बापू सोळुंके , औरंगाबाद उन्हाळ्याच्या सुटीत विवाह समारंभ, सहल अथवा अन्य कारणास्तव नागरिक बोहरगावी जातात. अशा घरांना चोरटे आपले लक्ष्य बनवीत असतात. त्यामुळे बाहेरगावी जाणारे नागरिक नेहमीच आपल्या मौल्यवान वस्तू घरात सुरक्षित राहतील अथवा नाही, याविषयी साशंक असतात. बंद घरासाठी तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी सुरक्षित घर योजना आणली होती. त्यांची बदली होताच सुरक्षित घर योजना मागे पडली आहे. परिणामी, चोर्‍या अन् घरफोड्या पुन्हा वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरटे दररोजच सरासरी दोन घरे फोडत आहेत. विशेषत: मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर्‍यांचे सत्र जोरात सुरू झाले आहे. उन्हाळ्यात नागरिक घराच्या गच्चीवर झोपायला जातात. तेव्हा घर बंद असते. चोरटे अशी घरे शोधून तेथे चोर्‍या करीत आहेत, तर उन्हाळ्याच्या सुटीत अनेक जण गावी जातात. मुलाबाळांसह गावी गेलेल्या कुटुंबाच्या घराला कुलूप असते. अशी बंद घरे फेडून चोरटे किमती ऐवज चोरून नेतात. अशा घरांत होणार्‍या चोर्‍या रोखण्यासाठी तत्कालीन सहायक आयुक्त नरेश मेघराजानी यांनी ‘सुरक्षित घर योजना’ सुरू केली होती. विशेषत: उन्हाळ्याची सुटी आणि दिवाळीत ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत होती. बाहेरगावी जाण्यापूर्वी आपल्या जवळच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना कळवावे. बाहेरगावी जाण्यापूर्वी आपल्या घराचा पत्ता पोलिसांना द्यावा. जोपर्यंत ते कुटुंब बाहेरगावाहून परत येत नाही तोपर्यंत ते घर सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांची असते. या काळात दिवसभरात तीन ते चार वेळा आणि रात्रीतूनही तीन वेळा त्या घराला भेट देत ते सुरक्षित असल्याची खात्री करीत असत. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्या लागताच प्रत्येक पोलीस ठाण्याचे निरीक्षक आपल्या हद्दीतील नागरिकांची बैठक घेऊन ही योजना त्यांना समजावून सांगत. त्यामुळे नागरिकांचाही पोलिसांवरील विश्वास वाढण्यास मदत होई. येथून बदलून गेलेले आणि मनमाड येथे कार्यरत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी मेघराजानी म्हणाले की, सुरक्षित घर योजना हे एक टीम वर्क आहे. ही योजना आम्ही आता मनमाड येथेही राबवीत आहोत. सुरक्षित घर योजनेमुळे चोर्‍यांना आळा घालता येतो. मात्र, त्यासाठी टीममधील प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असते.