शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पीकविम्याचा रेकाँर्ड बे्रक

By admin | Updated: August 6, 2014 02:16 IST

जालना : गेल्या दोन तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्याने पूर्णत: हपकून गेलेल्या कोरडवाहू व बागायतदार शेतकऱ्यांनी किमान

जालना : गेल्या दोन तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्याने पूर्णत: हपकून गेलेल्या कोरडवाहू व बागायतदार शेतकऱ्यांनी किमान यावर्षीच्या हंगामातील खरीप-रब्बी पिकांना संरक्षण मिळावे म्हणून पीक विम्याचा मोठ्या प्रमाणावर भरणा सुरू केला आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी पीक विमा भरण्याचे रेकॉर्ड बे्रक होईल, असा अंदाज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने वर्तविला आहे. या जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापूर्वी दुष्काळाने, गेल्यावर्षी गारपिटीने खरीप व रब्बी पिकांना मोठा तडाखा दिला होता. त्या सलग दोन वर्षाच्या नैसर्गिक आपत्तीने सर्वसामान्य शेतकरी हपकून गेला होता. विशेषत: या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने दुष्काळी स्थितीत सहाय्य अनुदान म्हणून प्रति हेक्टरी ठराविक रक्कम वितरीत केली. फळ उत्पादकांना सुद्धा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या अल्पशा मदतीने शेतकऱ्यांचे फारशे काही साधले नाही.या पार्श्वभूमीवर यावर्षीही आतापर्यंत पडलेल्या अल्पशा पावसाने सर्वसामान्य शेतकरी हादरून गेला आहे.त्यामुळेच या गोंधळलेल्या शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी पिकांना यावर्षी का होईना विम्याचे संरक्षण मिळावे म्हणून मोठी धडपड सुरू केली आहे. या जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती कोसळल्यानंतर विमा कंपन्यांनी आपदग्रस्तांना विम्याच्या रक्कमा वितरीत केल्या. त्याचा थोडाबहूत का असेना फायदा शेतकऱ्यांना झाला. यावर्षी सुद्धा स्थिती गंभीर आहे. त्यामुळेच गावोगावच्या शेतकऱ्यांनी पीक विम्यावर उशिराने का होईना लक्ष केंद्रीत केले आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करीत शेतकरी बँकांकडे धाव घेऊ लागले आहेत. राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत पीकविम्यास ३१ जुलैपर्यंत मुदत दिल्या गेली होती. कृषी खात्याने पीक विम्याची ही मुदत १६ आॅगस्टपर्यंत वाढविली आहे. परंतु ही मुदतवाढ ३१ जुलैनंतर वाढीव दिनांकापर्यंतच पेरणी झालेल्या क्षेत्रास लागू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा. प्रस्ताव दाखल करावे व त्याद्वारे विमा संरक्षण मिळवावे, असे आवाहनही केले. (जिल्हा प्रतिनिधी)