शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

‘वृक्षलागवड करा, अन्यथा पगार नाही’

By admin | Updated: September 7, 2014 00:23 IST

जालना : जिल्ह्यात ग्रामपंचायतींअंतर्गत वृक्षलागवडींची संख्या फारच कमी असल्याने व सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण समाधानकारक झाल्याने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्

जालना : जिल्ह्यात ग्रामपंचायतींअंतर्गत वृक्षलागवडींची संख्या फारच कमी असल्याने व सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण समाधानकारक झाल्याने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सर्व बीडीओ व ग्रामपंचातींच्या ग्रामसेवकांना वृक्षलागवड करून त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी आठवडाभराची मुदत दिली आहे. अन्यथा संबंधित ग्रामसेवकांचे वेतन अदा न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाअंतर्गत शतकोटी योजनेअंतर्गत तसेच मग्रारोहयोअंतर्गत सर्व ग्रामपंचायतींना वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. परंतु आतापर्यंत ग्रामपंचायतींमध्ये वृक्षलागवडीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यंदा पाऊस विलंबाने पडल्याने ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड कार्यक्रम राबविला नाही, असे सांगण्यात येते. परंतु गेल्या पंधरवाड्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने व येत्या काही दिवसांतही पाऊस चांगला पडण्याची शक्यता असल्याने सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांनी सर्व ग्रामपंचायतींना वृक्षलागवड करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी बीडीओ व ग्रामसेवकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ही माहिती वेबसाईटवर न टाकल्यास संबंधित ग्रामसेवकांचे पगार अदा न करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याचप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीला शासनाच्या विविध योजनांमार्फत मिळणारे अनुदानही थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासदंर्भात उपमुख्य कार्यकारी पी.टी. केंद्रे यांना विचारणा केली असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, याबाबत सर्व बीडीओंना व ग्रामसेवकांना पूर्वसूचना देण्यात आल्या असून काही ग्रामसेवक वृक्षलागवड कार्यक्रमाच्या तयारीलाही लागल्याचे केंद्रे यांनी सांगितले. सर्व ग्रामपंचायतीअंतर्गत अपेक्षित वृक्षलागवड करून त्याचे संवर्धनही केले जाईल, असा विश्वास केंद्रे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)एक हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये किमान ५०० तर एक हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये किमान १००० वृक्षलागवड करणे बंधनकारक आहे. आठवडाभरात वृक्षलागवड केल्याची सविस्तर माहिती जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर टाकण्याची सूचना ग्रामसेवकांना देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी पंचायत विभागाकडे प्रमाणपत्रही देणे आवश्यक आहे.