शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

प्रमुख पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला

By admin | Updated: September 18, 2014 00:39 IST

जालना : जिल्ह्यात कपाशीवर फुलकिडे, सोयाबीनवर चक्रीभुंगा तर मोसंबी व डाळींबावर फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

जालना : जिल्ह्यात कपाशीवर फुलकिडे, सोयाबीनवर चक्रीभुंगा तर मोसंबी व डाळींबावर फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी जोमात आलेले पीक पुन्हा एकदा धोक्यात आले आहे.कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी गेल्या आठवड्यात जिल्ह्यात विविध भागात पिकांची पाहणी केली. अभ्यासाअंती पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे लक्षात आले. पुणेगाव, पोकळ वडगाव, सोनदेव, पळसखेडा पिंपळे, शेलगाव आदी गावातील भेटींच्या आधारे खालील उपाययोजना सुचविल्या आहेत.जिल्ह्यात उशिराच्या मान्सूनमुळे कापसाची लागवड जुलैमध्ये झाल्याचे आढळते. सुरूवातीचा कमी पाऊस व उशिरा लागवड, उशिरा दिलेली खते यामुळे पहिल्या दोन महिन्यांत कापसाची वाढ कमी झाल्याचे आढळून आले. नंतर सततचा पाऊस व मिळालेली उघाड व पडलेले ऊन यामुळे कापूस पिकावर फुलकिड्यांचा (थ्रिप्स) प्रादुर्भाव जास्त झाल्याचे शास्त्रांचे म्हणणे आहे. ही किड अतिशय लहान व नाजुक असते. ही १ मि.मी. पेक्षा कमी लांब असून रंगाने फिकट पिवळसर असते. फुलकिडे आणि पिले कापसाच्या पानामागील भाग खरडवून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेशी शुष्क होतात. प्रथम तो भाग पांढुरका व नंतर तपकीरी होतो. त्यामुळे पाने, फुले व कळ्या आकसतात व झाडाची वाढ खुंटत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी पुढीलपैकी कुठलेही एक किटकनाशक योग्य प्रमाणात वापरून फवारणी करावी. अ‍ॅसिटामॅप्रीड २० टक्के, २ ग्रॅम किंवा थायोमेथॅक्झॉन २५ टक्के, २.५ ग्रॅम किंवा फिप्रिनिल ५ टक्के २० मि.ली. किंवा मिथील डेमॅटॉन २५ टक्के ८ मि.ली. किंवा अ‍ॅसिफेट ७५ टक्के २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले.सोयाबीनची पेरणी जुलैमध्ये झाल्यामुळे सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सोयाबीनवर खोड पोखरणारी प्रमुख कीड म्हणून चक्रीभुंग्यामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे. या किडीचा भुंगा फिकट तपकीरी रंगाचा ७ ते १० मि.मी. लांबीचा असतो. त्याचे समोरचे पंख खालच्या बाजूने एक तृतीयांश व अर्धा भाग काळ्या रंगाचे असतात. या किडीची अंडी पिवळसर लांबट आकाराची असून पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते. या किडीच्या अळीमुळे पिकांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मादी भुंगा पानाचे देठ, खोड यावर दोन खापा करते व खालच्या खापेजवळ अंडी घालण्यासाठी तीन छिद्र पाडते. खोडावर खापा केल्यास दोन ते तीन दिवसाने वरचा भाग सुकण्यास सुरूवात होते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जात असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. किडीच्या नियंत्रणासाठी औषधी फवारणी योग्य प्रमाणात करावी. डायमेथॉएट ३० टक्के १० मी.ली. किंवा ट्रायझोफॉस ४० ईसी १६ मि.ली. किंवा लॅम्बडा साहलोथ्रीन ५ टक्के ६ मि.ली. किंवा प्रोफिनोफॉस ५० टक्के २५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे.डाळींब व मोसंबी पिकावर अंबिया बहाराची फळे काढणीस तयार होत आहेत. हा पतंग रात्रीच्या वेळेस फळातील रस शोषण केल्यानंतर फळे गळून पडतात. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचे (डास) एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन त्यासाठी सुरूवातीला खाली प्रादुर्भावग्रस्त पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. गुळवेल, वासनवेळ यासारख्या तण काढावेत. किटकांचा प्रसार थांबविण्यासाठी बगीचा स्वच्छ ठेवावा, बागेच्या भोवताली सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत धूर करावा, प्रकाश सापळ्याचा वापर करावा व विषाचे अमिष तयार करून झाडाला बांधावेत. मेलॅथियॉन + फळाचा रस याचे द्रवण करून बाटलीमध्ये भरून ही बाटली झाडाला बांधावी. (वार्तहर)