शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शेंगदाणा-साबुदाणा वधारला!

By admin | Updated: July 31, 2014 00:46 IST

संजय लव्हाडे, जालना पावसाच्या गैरहजेरीमुळे धान्य व किराणा मालाची आवक म्हणावी तशी नाही. सराफा बाजारातही शांतता आहे. दरम्यान, श्रावणमासामुळे साबुदाणा, शेंगदाण्याचे भाव वधारले आहेत.

संजय लव्हाडे, जालनापावसाच्या गैरहजेरीमुळे धान्य व किराणा मालाची आवक म्हणावी तशी नाही. सराफा बाजारातही शांतता आहे. दरम्यान, श्रावणमासामुळे साबुदाणा, शेंगदाण्याचे भाव वधारले आहेत.रमजान ईद निमित्त सुकामेवा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उठाव दिसून आला. पेंडखजूरचे भाव ६० ते ५०० रुपये प्रतिकिलो, चारोळी ७०० ते ८५० रुपये प्रतिकिलो, खोबरा १५० ते १७५ रुपये प्रतिकिलो, काजू ४०० ते ८०० रुपये किलो, किसमिस १७० ते ३०० रुपये प्रतिकिलो होते.रेडिमेड कपडे, चप्पल-बूट, सुवासिक अत्तर, क्रॉकरी, ज्वेलरी तसेच फॅन्सी वस्तूंनी बाजारातत बऱ्यापैकी उलाढाल झाल्याचे चित्र आहे. धान्य बाजारातील आवक दिवसेंदिवस खालावत आहे. गव्हाची आवक दररोज ५० पोते इतकी असून ५० रुपयांची मंदी आल्यानंतर भाव १५०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज १०० पोते इतकी असून शंभर रुपयांची मंदी आल्यानंतर भाव १४०० ते ३१०० रुपये असे आहेत. सोयाबीनची आवक ५० पोती इतकी असून ५० रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर भाव ३९०० ते ३९५० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत. हरभऱ्याची आवक दररोज ५० पोती इतकी असून भाव २३०० ते २७०० रुपये असे आहेत. तुरीची आवक ५० पोती इतकी असून भाव ३९०० ते ४६०० रुपये असे आहेत.साबुदाणा व शेंगदाण्याच्या दरात ५०० रुपयांची तेजी आली. उत्पादन कमी आणि श्रावण महिना यामुळे ही तेजी आली. शेंगदाणा ५५०० ते ६५०० आणि साबुदाणा ६५० ते ७५०० असे भाव आहेत. सर्व प्रकारच्या डाळींचे भाव स्थिर आहेत.