शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

राज्य महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

By admin | Updated: June 13, 2014 00:32 IST

कडा: बीड- धामणगाव- अहमदनगर या राज्य महामार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत. यामुळे प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे.

कडा: बीड- धामणगाव- अहमदनगर या राज्य महामार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत. यामुळे प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे. यामुळे या मार्गावर वाहनांची संख्याही रोडावल्याने परिसरातील व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. २००० साली सा.बां. विभागाने बीड-धामणगाव- अहमदनगर या राज्यरस्त्याचे डांबरीकरण केले. हा रस्ता चांगला झाल्याने व येथून रहदारी वाढल्याने रस्त्यालगत अनेक ठिकाणी हॉटेल, ढाबे, रसवंतीगृह आदी व्यवसाय ग्रामस्थांनी सुरू केले. या रस्त्यावरून रहदारी वाढल्याने रस्त्यालगतचे व्यवसायही भरभराटीस आले होते. विशेष म्हणजे या रस्त्यावर एकही टोलनाका नसल्याने येथून वाहनचालकही जाणे पसंत करीत. यामुळे येथे वाहनांची रात्रंदिवस वर्दळ असायची. हा राज्यरस्ता झाल्याने या रस्त्यावरील दौलावडगाव, कारखेल, मसोबावाडी, घाटापिंप्री, धामणगाव, डोईठाण, पांढरवारी, कोतन, अंमळनेर, डोंगरकिन्ही, लिंबादेवी आदी ठिकाणी बाजारपेठही बहरास आल्या. या परिसरातील अनेक शेतकरी आपला माल बीड, अहमदनगर आदी ठिकाणी घेऊन जाऊ लागले. यामुळे त्यांचेही जीवनमान उंचावले. तसेच राज्य महामार्ग झाल्याने इतर व्यवसायही भरभराटीस आले. असे असले तरी या रस्त्यामुळे झालेल्या प्रगतीस अवघ्या दोन ते तीन वर्षातच ब्रेक लागला. या राज्य महामार्गावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडल्याने येथून प्रवास करणे जिकिरीचे होऊ लागले. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होऊ लागले तर प्रवाशांनाही त्रास होऊ लागला. यामुळे येथून प्रवास करणे प्रवासी टाळू लागले. त्यामुळे या मार्गावरून जाणारी वाहने आष्टी, जामखेड मार्गे नगरकडे जाऊ लागली. नगर- पाथर्डी - गेवराई हा ही रस्ता महामार्ग झाला. त्यामुळे बीड- धामणगाव- नगर रस्त्यावरील वाहतूक कमालीची घटल्याचे दादासाहेब जगताप यांनी सांगितले. या रस्त्यावर वळण व पूलही धोकादायक आहेत. रस्त्यावरील खड्डयासह पुलांचीही दुरूस्त करण्यास सा.बा. विभागाकडून हयगय होत आहे. गंभीर बाब म्हणजे चौदा वर्षात एकदाच येथे दुरूस्तीचे काम झाले आहे. परिणामी येथील वाहतूक रोडावल्याने व्यवसाय, शेतकरी अडचणीत आले आहेत.या संदर्भात सा.बां. विभागाचे उपअभियंता सुंदर पाटील म्हणाले, रस्त्यावरील खड्डे लवकरच बुजविण्यात येतील.