शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

परळीत मान्सूनपूर्व कामांचा उडाला फज्जा

By admin | Updated: June 23, 2014 00:20 IST

परळी: शहरातील पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचे काम झाले नसल्याने जोरात पाऊस सुरु झाल्यास नाल्यातील पाणी रस्त्यावर साचून नागरिकांची अडचण होण्याची शक्यता आहे.

परळी: शहरातील पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचे काम झाले नसल्याने जोरात पाऊस सुरु झाल्यास नाल्यातील पाणी रस्त्यावर साचून नागरिकांची अडचण होण्याची शक्यता आहे. न.प.च्या दुर्लक्षामुळे आतापर्यंत मान्सूनपूर्व कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. याचा त्रास परळी शहरवासियांना सहन करावा लागत आहे. न. प. च्या विरोधात परळीकर संताप व्यक्त करत आहेत.नेहरु चौकातील नाल्यांची साफसफाई झालेली नाही. तुंबलेल्या नाल्याही मोकळ्या करण्यात आलेल्या नाहीत. या नालीत डुकरांचे वास्तव्य नेहमीच असते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत असून त्यांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. नगरपालिकेचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.शहरातील नेहरु चौक, बसवेश्वर कॉलनी, गंगासागर नगर या भागात नाल्यांची सफाई झाली नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाल्यांचे पाणी घरात घुसून परिसरातील नागरिकांचे साहित्याचे नुकसान होत आहे. बसवेश्वर कॉलनीतून नवगण कॉलेज कमानीमार्गे लिटल फ्लॉवर स्कूल, बाजीप्रभू नगर या मार्गावरील नाल्याची स्वच्छता अद्याप केलेली नाही. या नाल्यांमध्ये डुकरांचा मुक्त संचार चालू असतो. तब्बल दोन महिन्यांपासून या नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या दुर्गंधीमुळे डासांचा उपद्रव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.बसवेश्वर कॉलनी पूल ते स्टेशन रोड पूल या ठिकाणी मातीचे ढिगारे साचले आहे. एका रांगेत साचलेले ढिगारे कोणी टाकले व का उचलले नाहीत असा सवाल शिवसेनेचे शहर उपप्रमुख वैजनाथ माने, किशन परांडे, नागेश माळी यांनी केला आहे. हे संबंधितांनी तरी उचलावेत, तरच पावसाचे पाणी व्यवस्थितरीत्या नाल्यातून जाईल. मातीच्या ढिगाऱ्यामुळे पोलिस क्वॉर्टरच्या पाठीमागे पावसाचे पाणी साचत आहे. याचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. शहराच्या माणिकनगर, नाथ रोड, गुरुकृपानगर, हमालवाडी या भागातील नाल्यांची स्वच्छता केलेली नाही. शहरातील अनेक मुख्य भागातील नाल्यासह रस्त्यांची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. शहरातील सर्व ठिकाणची कामे येत्या दोन दिवसात करण्यात येतील, असे नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांनी सांगितले.याबाबत मुख्याधिकारी यांनी नाल्यावरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचनाही याअगोदर दिल्या होत्या. मात्र याचा अद्यापही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. न.प. कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील स्वच्छता करण्यात येत असल्याचा दावाही न.प.ने केला आहे. दोन दिवसात शहरातील सफाई करण्यात येईल, असा शब्द न.प.ने दिल्यानंतर खरोखरच ही सफाई होईल काय, न.प. दिलेला शब्द पूर्ण करेल का हे पाहण्यासाठी परळीकर उत्सुक झाले आहेत. (वार्ताहर)धनंजय मुंडेंनी घेतली बैठकस्वच्छतेच्या संदर्भात आ. धनंजय मुंडे यांनी बैठक घेतली. बैठकीत नगराध्यक्ष दीपक देशमुख, मुख्याधिकारी संभाजी वाघमारे, कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे, स्वच्छता निरीक्षक श्रावणकुमार घाटे यांच्यासह स्वच्छता विभागातील कर्मचारी उपस्थित होती. ज्या त्या विभागातील कर्मचारी तेथेच वापरावेत अशा सूचनाही यावेळी मुंडे यांनी दिल्या. येत्या तीन दिवसात परळी शहर स्वच्छ दिसेल असे अश्वासनही त्यांनी दिले.