शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शिवरायांचे हस्तलिखित पैठणमध्ये; कावळे परिवाराकडे आहे शिवकालीन पत्रांचा अनमोल ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 12:38 IST

देशाची दक्षिण काशी असलेल्या पैठणच्या कावळे परिवाराकडे शिवकालीन हस्तलिखितांचा हा अनमोल ठेवा आजही उपलब्ध आहे. त्यात शिवरायांची हस्तलिखितेही आपण पाहू शकतो. 

ठळक मुद्देप्रतिष्ठाननगरीतील आतल्या नाथमंदिराच्या रस्त्यावर कावळे गल्ली आहे. तेथेच प्रकाश कावळे यांचे निवासस्थान आहे. च्याकडे छत्रपती शिवाजी महाराज ते हरजी भोसले (सन १६७६-१८५०) यांच्या २४० वर्षांच्या कालखंडात झालेल्या पत्रव्यवहाराची मूळ पत्रे संग्रही आहेत.कावळे परिवाराच्या ११ पिढ्यांनी जिवापाड जपलेल्या शिवकालीन हस्तलिखितांचा अमूल्य ठेवा कावळे यांचे वंशज आजही तेवढ्याच गांभीर्याने जतन करीत आहेत.

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी,’ अशी महती आपण शिवरायांची गातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यकथा वाचून आपण त्यांच्या महाप्रतापी रूपाची कल्पना करू शकतो. महाराजांचे हस्ताक्षर अनेकांनी ग्रंथ, पुस्तकातून पाहिले असेलही; परंतु त्यांचे मूळ हस्तलिखित पाहण्याचा योग दुर्लभच. देशाची दक्षिण काशी असलेल्या पैठणच्या कावळे परिवाराकडे शिवकालीन हस्तलिखितांचा हा अनमोल ठेवा आजही उपलब्ध आहे. त्यात शिवरायांची हस्तलिखितेही आपण पाहू शकतो. 

प्रतिष्ठाननगरीतील आतल्या नाथमंदिराच्या रस्त्यावर कावळे गल्ली आहे. तेथेच प्रकाश कावळे यांचे निवासस्थान आहे. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज ते हरजी भोसले (सन १६७६-१८५०) यांच्या २४० वर्षांच्या कालखंडात झालेल्या पत्रव्यवहाराची मूळ पत्रे संग्रही आहेत. कावळे परिवाराच्या ११ पिढ्यांनी जिवापाड जपलेल्या शिवकालीन हस्तलिखितांचा अमूल्य ठेवा कावळे यांचे वंशज आजही तेवढ्याच गांभीर्याने जतन करीत आहेत. एका पिढीपासून दुसर्‍या पिढीकडे हा वारसा सुपूर्द करीत आहेत. 

याविषयी ७२ वर्षीय प्रकाश कावळे यांनी सांगितले की, ज्येष्ठ शुद्ध १२ शके १५९६ (सन १६७४) रोजी शिवाजी महाराज यांचा शानदार राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्याचे पौरोहित्य काशीच्या गागाभट्टांनी केले होते. हे गागाभट्ट मूळचे पैठणचे होते. त्यांचे उपनाम कावळे होते. वेदाध्यायन व उपाध्येपण करणारी अशी भट्ट नावे असणारी तेव्हा बारा घराणी पैठणला विख्यात होती. 

राज्याभिषेकाच्या वेळी वेदशास्त्र संपन्न गागाभट्ट यांना पैठणचे गोविंद भट कावळे यांनी साथ दिली होती. कावळे घराणे गागाभट्टांचे वंशज असून, राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गोविंद भट यांना पैठणचे उपाध्येपण बहाल केले होते. त्याकाळी तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी पूजा-अर्चा करण्यासाठी उपाध्याय नेमण्याची प्रथा होती. यजमान धार्मिकविधीसाठी तीर्थक्षेत्री यायचे. लॉज नसल्यामुळे त्याकाळी उपाध्यांच्या घरीच थांबायचे. विधी आटोपला की, दक्षिणा देऊन क्षेत्र सोडायचे. त्या काळात यजमान आणि त्यांच्यासोबत आलेले इतर यांची नोंद एका वहीत करून ठेवली जायची. त्यानंतर अनेक वर्षे छत्रपती भोसले घराणे व कावळे घराण्यादरम्यान पत्रव्यवहार झाला. ते सर्व हस्तलिखित पत्रे जतन करून ठेवली आहेत.कावळे परिवाराने यातील काही हस्तलिखिते स्व. बाळासाहेब पाटील यांच्या संग्रहालयात दिली आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या संग्रही छत्रपती संभाजी महाराजांचे हस्तलिखितही आहे. हस्तलिखितांचा मजकूर मोडी लिपीतील आहे. कावळे यांनी मोडीलीपीतील जाणकारांकडून या पत्रांचा मराठी व इंग्रजी भाषेत अनुवाद करून घेतला आहे. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची हस्तलिखिते पाहण्यास मिळणे हा दुर्मिळच योग होय. 

संग्रहात असलेली हस्तलिखिते प्रकाश कावळे यांच्या संग्रहात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्रांसह मानकोजीराजे भोसले, परसोजीराजे भोसले, व्यंकोजीराजे भोसले, शाहूराजे भोसले, संताजीराजे भोसले, मुधोजीराजे भोसले, मल्हारराव होळकर, राणोजीराजे भोसले (हिंगणीकर),भगवानराव राजे शिर्के, रामभट्ट बंदिष्ठी व हरजी भोसले यांची पत्रे सुस्थितीत आहेत.

हस्तलिखित : छत्रपती शिवाजी महाराजांचे  

पैठण येथील उपाध्ये म्हणून आपल्यास मान्यता देण्यात आली आहे. भोसले घराण्यातील वंशज जेव्हा जेव्हा तीर्थक्षेत्री येतील तेव्हा तेव्हा त्यांना वंशवळी दाखविण्यात यावी, असे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडी लिपीत लिहिलेल्या मजकुरात म्हटल्याचे संग्राहक प्रकाश कावळे यांनी सांगितले. 

छत्रपती संभाजी महाराजांचे 

छत्रपती संभाजी महाराज यांनी १० ओळींचे पत्र मोडीलिपीत लिहिलेले आहे. या पत्रात असे स्पष्ट लिहिले आहे की, ते ज्या वेळेस पैठणला येतील तेव्हा कावळे यांनी शहाजीराजे आणि शिवाजीराजे या दोघांची पत्रे दाखवावीत. ती जर दाखविली नाहीत तर कावळे यांची उपाध्येपदावरील नेमणूक रद्द समजली जाईल. १८ जून १६८९ रोजी लिहिलेल्या पत्रावर त्यांची राजमुद्रा नसली तरी ‘मर्यादेयं विजयते’अशी मर्यादामुद्रा आहे. 

संशोधनाची आवश्यकता

आमच्या ११ पिढ्यांनी शिवकालीन हस्तलिखिते जपून ठेवली आहेत. या ऐतिहासिक दस्तावेजावर संशोधन झाले तर नवीन माहिती समाजासमोर येऊ शकेल. यासाठी इतिहासाचे अभ्यासक, संशोधकांनी पुढाकार घ्यावा. त्यांना कावळे परिवार सहकार्य करेल. पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनीही शिवकालीन हस्तलिखिते पाहिली आहेत. - प्रकाश कावळे, संग्राहक, शिवकालीन हस्तलिखिते.