शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क द्या

By admin | Updated: December 1, 2014 01:27 IST

औरंगाबाद : शासकीय जागेवर वास्तव्य करीत असलेल्या भूमिहीन शेतमजूर, दलित, आदिवासी कुटुंबांना त्यांच्या घराचा मालकी हक्क मिळावा, याकरिता औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

औरंगाबाद : शासकीय जागेवर वास्तव्य करीत असलेल्या भूमिहीन शेतमजूर, दलित, आदिवासी कुटुंबांना त्यांच्या घराचा मालकी हक्क मिळावा, याकरिता औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा काढल्या आहेत.अहमदनगर येथील श्रावणबाळ माता-पिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोपडा यांनी अ‍ॅड. नितीन गवारे पाटील यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती ए.एम. बदर यांच्यासमोर याचिकेची सुनावणी झाली असता याचिकाकर्त्यांनी न्यायालयात नमूद केले की, १९७२ च्या केंद्र शासनाच्या २० कलमी कार्यक्रमांतर्गत भूमिहीन शेतमजूर, दलित, आदिवासी यांना राहत्या घरासाठी शासकीय जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. त्याचवेळी त्यांना मालकी हक्क देण्याचा निर्णय घेण्यात झाला होता. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे हे रहिवासी आजही शासनाच्या लेखी अतिक्रमणधारक आहेत. ४ एप्रिल २००२ च्या शासन निर्णयानुसार १ जानेवारी १९९५ पर्यंत मुंबई, उपनगर जिल्हा वगळून राज्यातील उर्वरित जिल्ह्यातील झोपडपट्टींना संरक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे निवासी प्रयोजनासाठी ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी, सरपंच, नगररचनाकार यांची समिती स्थापन करण्यास सांगितले. समितीने ले-आऊट केलेला आराखडा मंजूर करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना तर शहरी भागात मनपा आयुक्तांना देण्यात आले. त्यामुळे हजारो झोपडपट्टीधारक मालकी हक्काच्या उताऱ्यापासून वंचित आहेत. मूलभूत सोयी-सुविधा त्यांना मिळत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. शासन निर्णयाच्या आधारे कुटुंबांना मालकी हक्क देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाने प्रतिवादी महाराष्ट्र शासन आणि अन्य सात जणांना नोटिसा काढून याचिकेची सुनावणी ८ जानेवारी रोजी ठेवली आहे.