शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

सप्टेंबरपर्यंतचा पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्याचे आदेश

By admin | Updated: July 4, 2014 00:19 IST

जालना : जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी टंचाई आराखडा तातडीने तयार करावा, असे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी बजावले आहेत.

जालना : भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, म्हणून जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी टंचाई आराखडा तातडीने तयार करावा, असे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी बजावले आहेत.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी दुपारी टंचाईसदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नायक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खास बैठक आयोजित केली. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतेवार यांच्यासह उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे व इतर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा तसेच भविष्यातील पाणीटंचाई या अनुषंगाने जिल्हाधिकारी नायक यांनी तपशीलवार आढावा घेतला. तसेच जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी तातडीने पाणीटंचाईचा आराखडा तयार करावा, अशा सूचना बजावल्या. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे नायक यांनी नमूद केले. जिल्ह्यात ९० दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे. परंतु भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना कराव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. सतत टँकर सुरू असलेल्या गावात भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सूचविलेल्या कामांसाठी शासनाकडून उपलब्ध निधीतून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. टंचाईच्या काळात मजुरांना काम मिळावे, म्हणून मागणीनुसार नवीन कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत, मजुरांची प्रलंबित मजुरी तात्काळ अदा करावी व नवीन कामे हाती घेताना जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.या जिल्ह्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट व्हावे म्हणून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला आहे. परंतु त्या निधीचा अद्यापपर्यंत म्हणावा एवढा विनियोग झाला नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या गोष्टीची दखल घ्यावी व पाण्याच्या स्त्रोत बळकटीकरणासाठी तातडीने हालचाली कराव्यात, असे नायक यांनी म्हटले. यावेळी अन्य अधिकाऱ्यांनी विभागनिहाय अहवाल सादर केला. (प्रतिनिधी)अनधिकृत पाणी उपशाविरुद्ध संयुक्त कारवाईची सूचना प्रकल्पातील अवैध पाणी उपसा होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणेने प्रकल्प क्षेत्रातील कृषीपंपांचा वीजपुरवठा तोडण्याची मोहीम हाती घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहेत.गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पातील अल्पशा पाणीसाठ्यातूनही मोठ्या प्रमाणावर उपसा होत आहे.अपूर्ण पाणीपुरवठा नळयोजना पूर्ण करण्यासाठी तसेच पूर्ण झालेल्या योजनांसाठी महावितरण कंपनीने तात्काळ विद्युत जोडणी द्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहेत.तालुकानिहाय आढावा सादर होणारजिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीनंतर संबंधित यंत्रणांनी तालुकानिहाय आढावा घ्यावा, असे आदेशसुद्धा प्रशासनाने बजावले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात अपुरा पाऊस झालाा आहे. या पार्श्वभूमीवर काही तालुक्यांमधून तीव्र टंचाई भासेल, असा अंदाज व्यक्त होतो आहे. त्यामुळेच सरकारी यंत्रणेने या गोष्टीची गांभिर्याने दखल घ्यावी, असे प्रशासनाने बजावले.