शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अडत बाजारात कांदा गडगडला

By admin | Updated: July 15, 2016 01:06 IST

औरंगाबाद : जाधववाडीतील कृउबा समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलात बेमुदत बंदनंतर गुरुवारी पहाटे फळ-पालेभाज्यांच्या अडत व्यवहाराला सुरुवात झाली

औरंगाबाद : जाधववाडीतील कृउबा समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलात बेमुदत बंदनंतर गुरुवारी पहाटे फळ-पालेभाज्यांच्या अडत व्यवहाराला सुरुवात झाली. मात्र चोहोबाजूंनी १५० टन कांद्यांची आवक झाल्याने भाव गडगडले. हर्राशीमध्ये क्विंटलला २५० ते ७०० रुपये नीचांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. कारण कांद्याचा मोठा साठा कांदाचाळीत शिल्लक असून, बाजारात मातीमोल भावात कांदा विकावा लागत आहे. कांदा ६ टक्के अडत देऊन खरेदीदारांनी खरेदी केला. मागील चार दिवसांनंतर पुन्हा एकदा फळे-पालेभाज्यांच्या अडत बाजारात पहाटे हर्राशीचा आवाज कानावर पडला. सर्वप्रथम अडत्यांनी शेतकरी व खरेदीदारांना एकत्र बोलावले व अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करावी, असा राज्य सरकारचा अध्यादेश असल्याचे स्पष्ट केले. अडत देण्यास जे खरेदीदार तयार होते, त्यांनीच हर्राशीत भाग घेतला. त्यानंतर प्रत्येक अडत्याच्या दुकानासमोर हर्राशी करण्यात आली. चार दिवसांनंतर अडत सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणला. चातुर्मासाला सुरुवात होत आहे. या काळात अनेक जण कांदा खात नाहीत. त्यामुळे पुढील चार महिने कांद्याचा उठाव कमी राहणार असल्याने खरेदीदारांनी हर्राशीतून हात आखडता घेतला. परिणामी मागील आठवड्यात ३०० ते ८०० रुपये क्विंटलप्रमाणे विक्री झालेला कांदा शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५० ते १०० रुपये कमी भावात विकावा लागला. अजून शेतकऱ्यांकडे कांदाचाळीत मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असून, येत्या दीड महिन्यानंतर कर्नाटकमधील नवीन कांद्याची आवक सुरूहोईल. तेव्हा कांद्याचे भाव आणखी कमी होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या दीड महिन्यात आपल्याकडील कांदा विक्री करावा लागणार आहे.कांद्याला ५०० ते १००० रुपयांपर्यंत भाव मिळतील, या आशेने शेतकरी आले होते. मात्र हर्राशी कमी भावात झाल्याने शेतकरी संतापले होते. अडत खरेदीदारांकडून वसूल केल्यामुळेच खरेदीदारांनी कमी बोली लावून कांद्याचे भाव पाडले, असा आरोप शेतकरी करीत होते. अन्य फळ, पालेभाज्यांचीही चांगली विक्री झाली.