शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

अडत बाजारात कांदा गडगडला

By admin | Updated: July 15, 2016 01:06 IST

औरंगाबाद : जाधववाडीतील कृउबा समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलात बेमुदत बंदनंतर गुरुवारी पहाटे फळ-पालेभाज्यांच्या अडत व्यवहाराला सुरुवात झाली

औरंगाबाद : जाधववाडीतील कृउबा समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलात बेमुदत बंदनंतर गुरुवारी पहाटे फळ-पालेभाज्यांच्या अडत व्यवहाराला सुरुवात झाली. मात्र चोहोबाजूंनी १५० टन कांद्यांची आवक झाल्याने भाव गडगडले. हर्राशीमध्ये क्विंटलला २५० ते ७०० रुपये नीचांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. कारण कांद्याचा मोठा साठा कांदाचाळीत शिल्लक असून, बाजारात मातीमोल भावात कांदा विकावा लागत आहे. कांदा ६ टक्के अडत देऊन खरेदीदारांनी खरेदी केला. मागील चार दिवसांनंतर पुन्हा एकदा फळे-पालेभाज्यांच्या अडत बाजारात पहाटे हर्राशीचा आवाज कानावर पडला. सर्वप्रथम अडत्यांनी शेतकरी व खरेदीदारांना एकत्र बोलावले व अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करावी, असा राज्य सरकारचा अध्यादेश असल्याचे स्पष्ट केले. अडत देण्यास जे खरेदीदार तयार होते, त्यांनीच हर्राशीत भाग घेतला. त्यानंतर प्रत्येक अडत्याच्या दुकानासमोर हर्राशी करण्यात आली. चार दिवसांनंतर अडत सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणला. चातुर्मासाला सुरुवात होत आहे. या काळात अनेक जण कांदा खात नाहीत. त्यामुळे पुढील चार महिने कांद्याचा उठाव कमी राहणार असल्याने खरेदीदारांनी हर्राशीतून हात आखडता घेतला. परिणामी मागील आठवड्यात ३०० ते ८०० रुपये क्विंटलप्रमाणे विक्री झालेला कांदा शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५० ते १०० रुपये कमी भावात विकावा लागला. अजून शेतकऱ्यांकडे कांदाचाळीत मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असून, येत्या दीड महिन्यानंतर कर्नाटकमधील नवीन कांद्याची आवक सुरूहोईल. तेव्हा कांद्याचे भाव आणखी कमी होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या दीड महिन्यात आपल्याकडील कांदा विक्री करावा लागणार आहे.कांद्याला ५०० ते १००० रुपयांपर्यंत भाव मिळतील, या आशेने शेतकरी आले होते. मात्र हर्राशी कमी भावात झाल्याने शेतकरी संतापले होते. अडत खरेदीदारांकडून वसूल केल्यामुळेच खरेदीदारांनी कमी बोली लावून कांद्याचे भाव पाडले, असा आरोप शेतकरी करीत होते. अन्य फळ, पालेभाज्यांचीही चांगली विक्री झाली.