शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अडत बाजारात कांदा गडगडला

By admin | Updated: July 15, 2016 01:06 IST

औरंगाबाद : जाधववाडीतील कृउबा समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलात बेमुदत बंदनंतर गुरुवारी पहाटे फळ-पालेभाज्यांच्या अडत व्यवहाराला सुरुवात झाली

औरंगाबाद : जाधववाडीतील कृउबा समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलात बेमुदत बंदनंतर गुरुवारी पहाटे फळ-पालेभाज्यांच्या अडत व्यवहाराला सुरुवात झाली. मात्र चोहोबाजूंनी १५० टन कांद्यांची आवक झाल्याने भाव गडगडले. हर्राशीमध्ये क्विंटलला २५० ते ७०० रुपये नीचांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. कारण कांद्याचा मोठा साठा कांदाचाळीत शिल्लक असून, बाजारात मातीमोल भावात कांदा विकावा लागत आहे. कांदा ६ टक्के अडत देऊन खरेदीदारांनी खरेदी केला. मागील चार दिवसांनंतर पुन्हा एकदा फळे-पालेभाज्यांच्या अडत बाजारात पहाटे हर्राशीचा आवाज कानावर पडला. सर्वप्रथम अडत्यांनी शेतकरी व खरेदीदारांना एकत्र बोलावले व अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करावी, असा राज्य सरकारचा अध्यादेश असल्याचे स्पष्ट केले. अडत देण्यास जे खरेदीदार तयार होते, त्यांनीच हर्राशीत भाग घेतला. त्यानंतर प्रत्येक अडत्याच्या दुकानासमोर हर्राशी करण्यात आली. चार दिवसांनंतर अडत सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणला. चातुर्मासाला सुरुवात होत आहे. या काळात अनेक जण कांदा खात नाहीत. त्यामुळे पुढील चार महिने कांद्याचा उठाव कमी राहणार असल्याने खरेदीदारांनी हर्राशीतून हात आखडता घेतला. परिणामी मागील आठवड्यात ३०० ते ८०० रुपये क्विंटलप्रमाणे विक्री झालेला कांदा शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५० ते १०० रुपये कमी भावात विकावा लागला. अजून शेतकऱ्यांकडे कांदाचाळीत मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असून, येत्या दीड महिन्यानंतर कर्नाटकमधील नवीन कांद्याची आवक सुरूहोईल. तेव्हा कांद्याचे भाव आणखी कमी होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या दीड महिन्यात आपल्याकडील कांदा विक्री करावा लागणार आहे.कांद्याला ५०० ते १००० रुपयांपर्यंत भाव मिळतील, या आशेने शेतकरी आले होते. मात्र हर्राशी कमी भावात झाल्याने शेतकरी संतापले होते. अडत खरेदीदारांकडून वसूल केल्यामुळेच खरेदीदारांनी कमी बोली लावून कांद्याचे भाव पाडले, असा आरोप शेतकरी करीत होते. अन्य फळ, पालेभाज्यांचीही चांगली विक्री झाली.