शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

शहर बसच्या एक हजार फेऱ्या

By admin | Updated: March 14, 2016 00:54 IST

औरंगाबाद : शहरात १५ मार्चपासून आॅटोरिक्षांसाठी मीटर सक्तीची मोहीम राबविण्यात येणार आहे. याचा सर्वसामान्य प्रवाशांना मात्र, फटका बसणार आहे.

तक्रार बेदखल : जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा सल्लाचंद्रपूर : येथील गोंडकालीन पुरातन किल्ल्याची तोडफोड करण्यात आली. अतिक्रमणामुळे किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे एनासियंट अ‍ँड आर्कियोलॉजीकल साईटस् अ‍ॅन्ड रिमेन्स अ‍ॅक्ट १९५८ अधिनियमानुसार किल्ल्याचे नुकसान व त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणासाठी दोषी असलेले पुरातत्त्व अधिकारी, आमदार व मनपा आयुक्तांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केली होती. मात्र तक्रारीवरून २० दिवस लोटल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याउलट पोलीस यंत्रणेने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागावी, असे पत्र देऊन राजेश बेले यांची बोळवण करण्यात आली आहे. इरई व झरपट नदीच्या संगमावरील भूभागावर वसलेल्या चंद्रपूर शहराची ख्याती पुरातन काळापासून आहे. शहरात दिमाखाने उभा असलेला किल्ला गोंडराजांनी १४६१ ते १५७२ या काळात बांधलेला आहे. पुरातन वास्तुकलेचा उत्कृ ष्ठ नमुना असलेला देखणा किल्ला व त्याचे परकोट असामाजिक तत्त्वांच्या कृत्याला बळी पडला आहे. काही नागरिकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी किल्ल्याच्या परकोटाची तोडफोड केली तर कुणी किल्ल्याच्या भिंतीवर घर बांधले. काहींनी घर बांधण्यासाठी किल्ल्याची भिंत तोडली. काही ठिकाणी किल्ल्याचा परकोट तोडून २० फुटांचा रस्ता तयार केला. महानगरपालिकाही या विषयात मागे नाही. मनपाच्यावतीने दोन ठिकाणी किल्ल्याच्या जागेवर शौचालय बांधले. केंद्र सरकारने पुरातन वास्तूचे जतन व्हावे, यासाठी विशेष अधिनियम तयार केला. त्यानुसार तक्रारीनंतर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा सल्ला देण्यात आले.