औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदार ओळखपत्र नसेल, तर आयोगाने मान्यता दिलेल्या १३ पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखवून मतदान करता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधितांना तशा सूचना दिल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना याविषयी १२ जून रोजी पत्र पाठविले आहे. मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी छायाचित्र असलेल्या १३ पुराव्यांचा उपयोग ओळखपत्र म्हणून करण्यास या पत्रान्वये मान्यता दिली आहे. यामध्ये पासपोर्ट, वाहन परवाना, पॅनकार्ड, पदवी/पदविका प्रमाणपत्र, छायाचित्रासह ३१ मेपूर्वीचे बँक पासबुक, छायाचित्रासह मालमत्ता नोंदणीपत्र, रेशन कार्ड, एनपीआरअंतर्गत देण्यात आलेले आरजीआय स्मार्टकार्ड आदींचा समावेश आहे. त्यामुळे मतदारांना मतदानाच्या दिवशी वरीलपैकी कोणताही एक पुरावा सोबत आणावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मतदानासाठी चालेल तेरापैकी एक पुरावा
By admin | Updated: June 18, 2014 01:38 IST