शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार, पेयजल योजनेवर वादळी चर्चा

By admin | Updated: December 9, 2015 00:40 IST

जालना : पोषण आहार, पाणीटंचाई आणि आरोग्य सुविधेच्या मुद्यांवरून जिल्हा परिषदेची मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली.

जालना : पोषण आहार, पाणीटंचाई आणि आरोग्य सुविधेच्या मुद्यांवरून जिल्हा परिषदेची मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. पोषण आहाराच्या मुद्यावरून सदस्य बप्पासाहेब गोल्डे यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. ग्रामीण भागातील पेयजल योजना, आरोग्य, पोषण आहार आदी महत्त्वपूर्ण विषयांवर काही सत्ताधारी आणि विरोधक सदस्यांनी प्रश्न विचारून सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले. यावेळी अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, उपमुख्यकार्यकारी मुकीम देशमुख, संभाजी उबाळे, भगवान तोडावत, राहुल लोणीकर, बाळासाहेब वाकुळणीकर, बप्पासाहेब गोल्डे, रामेश्वर सोनवणे, संजय काळबांडे, सतीश टोपे, शीतल गव्हाड आदी प्रमुख सदस्यांची उपस्थिती होती.संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होत आहे. काही गावांतून आत्तापासूनच टँकरची मागणी वाढत आहे. परंतु याकडे जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग गंभीर नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी प्रशासनाकडून सरकारला अहवाल पाठविण्यात यावा, अशी मागणी सदस्यांनी केली होती. मात्र प्रशासनाने जिल्ह्याकडे निधी असल्याचे भासवून प्रस्ताव गुंडळला. परिणामी जिल्ह्याला पीककर्जातून वगळण्यात आले. शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. पेयजल योजनेच्या कामांची १० कोटी रूपये जिल्हा परिषदेकडे देयके थकली आहेत. ही देयक न मिळाल्याने पाणीपुरवठ्या परिणाम होत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. जि.प. दोन्ही पक्षाची युती असल्याने केंद्र आणि राज्यसरकारकडून निधी आणण्यासाठी कोणत्या अडचणी येत आहेत, हे सभागृहासमोर सांगाव्यात अशी एकमुखी मागणी विरोधी सदस्यांनी केली. तत्कालीन सीईओ प्रेरणा देशभ्रतार आणि पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तांगडे यांनी केलेल्या चुकीच्या कामाचा कित्ता सध्याचे सीईओ दीपक चौधरी आणि सत्ताधारी गिरवत असल्याने त्याचे परिणाम जिल्हा परिषदेला भोगावे लागत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. ‘अच्छे दिन’ कधी येणार अशी विचारणा केली. गटातटाचे भांडणे सोडून पेयजल योजनेसाठी निधी आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले.रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील नदी व नाले परिसरात जि.प. ने विहिरी खोदल्यास पाणीप्रश्न काहीअंशी कमी होण्यास मदत मिळेल, असा विश्वास काही सदस्यांनी व्यक्त केला. संभाजी उबाळे यांनी हा ठराव मांडला. या प्रस्तावास सीईओ चौधरी यांनी दुजोराही दिला. असा प्रस्ताव शासनाला पाठविणार असल्याचे चौधरी म्हणाले. जाफराबाद तालुक्यातील भारज येथे २ कोटी रूपये खर्च बांधण्यात आलेल्या नागरी दवाखान्याला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा देण्याची मागणी शीतल गव्हाड यांनी केली. (वार्ताहर)ज्येष्ठ सदस्य बप्पासाहेब गोल्डे यानी बालकांना देण्यात येत असलेल्या पोषण आहार (सुकडी) बद्दल प्रश्न उपस्थित केला. अत्यंत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार जिल्ह्यात वाटप होत असल्याचा आरोप गोल्टे यांनी केला. तो जनावरांना खाण्यास योग्य नसल्याचा आरोप गोल्डे यांनी केला. जि. प. अध्यक्ष, सीईओ आणि सर्व सदस्यांनी एकवेळेस हा आहाराची चव घेऊन बघावी असे, आवाहन त्यांनी केले. सत्ताधारी सदस्यच पोषण आहाराच्या मुद्यावर आक्रमक झाल्याने सत्ताधाऱ्यांना घरचाच आहेर मिळाला. ४गोल्डे यांनी विचारलेल्या प्रश्नाला महिला व बालकल्याण अधिकारी वर्षा पवार यांनी उत्तर देण्याचा कसबसा प्रयत्न केला. परंतु गोल्डे यांंचे समाधान झाले नाही. पुढच्या सर्वसाधारण सभेपर्यंत मला उत्तर न मिळाल्यास याबाबत मी कोर्टात जाणार असल्याचा इशारा गाल्डे यांनी दिला.